Full Width(True/False)

सुशांत आत्महत्या: बिहार पोलीस मुंबईत येताच रियाची पळापळ, सुप्रीम कोर्टात याचिका

मुंबई: आत्महत्या प्रकरणात सध्या बरेच ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या असून तपासाला वेग आला आहे. महत्त्वाचं म्हणजे सुशांतचे वडील कुंदन कुमार यांनी सुशांतची गर्लफ्रेंड हिनं त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत बिहार येथील न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी बिहार पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. बिहार पोलिस चौकशीसाठी मुंबईत आल्यानं रिया चक्रवर्तीनं तपास मुंबईतच वर्ग करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात तातडीची याचिका केली आहे. रियाचे वकील अॅड. यांनी ही माहिती दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, मानेशिंदे यांनी अंतरिम जामीनसाठी मंगळवारीच पेपर्स पुढे केले होते. यानंतर कनिष्ठ वकील आनंदिनी फर्नांडिसला रियाच्या घरी पाहण्यात आलं. सुशांतच्या वडिलांनी सात पानी एफआयआरमध्ये सुशांतच्या अकाउंटमधून १५ कोटी रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती दिली होती. रिया आणि तिचं कुटुंब जाणीवपूर्वक सुशांतला मानसिकरित्या आजारी असल्याचं दाखवत होते असंही केके सिंह म्हणाले. विशेष म्हणजे रियानं तिची बाजू मांडण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या आणि महागड्या वकिलाची नियुक्ती केली आहे. तिची ही केस लढणार आहेत. याआधी मानेशिंदे यांनी सलमान खान आणि संजय दत्तची केस सांभाळली होती. सुशांतच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीने आता वेगळं वळण घेतलं आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली. सुशांतला आत्महत्येसाठी उकसावण्यासारखा आरोप त्यांनी केला. आता रियाने वकील सतीश यांची निवड केली. १९९८ मधील काळवीट शिकार प्रकरण असो की संजय दत्तची १९९३ मधील मुंबंई साखळी हल्ला असो दोघांचीही वकिली मानेशिंदे यांनी केली होती. आज रिया अंतरिम जामीनसाठी अर्ज करू शकते. २५ फेब्रुवारीला मुंबई पोलिसांना दिली होती सुचना सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी यांनी अनेक धक्कादायक खुलासेही यावेळी केले. सुशांतच्या कुटुंबाला आधीपासूनच त्याच्यासोबत काहीतरी चुकीचं होईल याची भीती वाटत होती. यासाठीच २५ फेब्रुवारी २०२० रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात यासंबंधी माहिती दिली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2P6S0NS