Full Width(True/False)

भारतात २,२२५ कोटी रुपयांचे स्मार्टफोन आयात, या कंपन्या आघाडीवर

नवी दिल्लीः २०२० मध्ये स्मार्टफोन मार्केटने खूप चढ उतार पाहिला आहे. करोना व्हायरस लॉकडाऊनचा परिणाम मार्केटवर पडला आहे. जून महिन्यात ३ वर्षात सर्वात जास्त रेकॉर्ड आयात भारतात केले आहे. भारतात जवळपास संपूर्ण स्मार्टफोन मार्केट विदेशी कंपन्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे सर्वात जास्त फोन हे विदेशातून येतात. लोकल उत्पादनावर लॉकडाऊनचा परिणाम झालेला पाहायला मिळाला आहे. आता हळूहळू मार्केट सुरू झाले आहे. वाचाः मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सकडून शेयर करण्यात आलेल्या डेटा नुसार, फेब्रुवारी महिन्यात ५.६ कोटी रुपयांच्या किंमतीचे फोन आयात करण्यात आले होते. तर जून महिन्यात भारतात आयात केलेल्या फोन्सची किंमत २२२५ कोटी रुपये आहे. हे मे महिन्यात करण्यात आलेल्या आयात (इंपोर्ट) पेक्षा सहा पट अधिक आहे. मार्केट एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, जुलै महिन्यात ही आयात १० पट अधिक वाढू शकते. इंपोर्ट करणाऱ्या कंपन्यात चीनची कंपनी शाओमी, विवो, ओप्पो आणि रियलमी सर्वात जास्त वर आहे. वाचाः लॉकडाऊनची मजबूरी काउंटरपॉइंट रिसर्चचे असोसिएट डायरेक्टर तरुण पाठक यांनी सांगितले की, स्मार्टफोन ब्रँड्सला या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे. जून मध्ये वेगाने आयात करणे कारण बनले होते. करोना व्हायरसच्या आधी भारतात विकल्या गेलेल्या जवळपास ९५ टक्के फोन भारतात लोकल प्लांट्समध्ये असेंबल करण्यात आले होते. त्यावेळी आयात करण्यात आल्याची व्हॅल्यू जवळपास ५.६ कोटी रुपये होती. वाचाः फोन आयात करावे लागले सर्वात जास्त स्मार्टफोन ब्रँड्स विवो, ओप्पो, रियलमी, वनप्लस आणि सॅमसंगचे भारतात आपले प्रोडक्शन प्लांट आहेत. नोएडा आणि नॉर्थ इंडिया आणि साऊथ मध्ये बनवण्यात आलेल्या या प्लांट्समध्ये डिव्हाईसेजचे प्रोडक्शन लॉकडाऊन मुळे सुरू होण्यात उशीर झाला त्यामुळे कंपन्यांना फोन आयात करावे लागले. या प्लांट्समध्ये विदेशातून पार्ट्स मागवले जातात. त्यानंतर फोन भारतात बनवले जातात. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/313KcSu