Full Width(True/False)

पाचपैकी एक तरी पुरावा मिळाला तर रियाला निश्चित होणार अटक!

मुंबई- प्रकरणात सीबीआय, ईडी आणि आता नारकोटिक्स ब्युरोची चौकशी सुरू आहे. सीबीआयने मुंबईत चौकशी सुरू केल्यानंतर आठव्या दिवशी या प्रकरणाची मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीची चौकशी केली. रविवारीपर्यंत सलग तीन दिवस तिची चौकशी करण्यात आली. आज सोमवारी चौथ्या दिवशीही रिया चक्रवर्तीची चौकशी केली जात आहे. सीबीआयने तीन दिवसांमध्ये रियाची जवळपास २६ तास चौकशी केली आहे. सुशांतचे कुटुंबिय आणि त्याचे चाहते करत आहेत रियाच्या अटकेची मागणी सुशांत प्रकरणात त्याच्या मृत्यूनंतर लगेचच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविली. याआधी मुंबई पोलिसांच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पोलिसांनी कोणताही एफआयआर दाखल केली नाही तसेच कोणालाही अटक केले नाही यावरही प्रश्न विचारण्यात आले. अशात जेव्हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला तेव्हा सुशांतच्या कुटुंबियांपासून ते त्याच्या चाहत्यांपर्यंत साऱ्यांनाच वाटलं की आता रियाला अटक केली जाईल. चौकशी दरम्यान, प्रकरणात अनेक नव्या गोष्टी समोर आल्या आणि ईडी तसंची या टीमही तपासात सक्रीय झाल्या. एनसीबीच्या टीमने गुरुवारी मुंबई गाठली आणि शुक्रवारी सीबीआयने रियाला पहिल्यांदा चौकशीसाठी बोलावलं. आता सीबीआयला हे देखील समजलं आहे की एनसीबीचं प्रकरण अधिक मजबूत आहे. अशा परिस्थितीत एनसीबीने रियाला प्रथम बोलावून पुराव्यानिशी अटक केली असती तर सीबीआयला पुढील तपासात अडचणी आल्या असत्या. याचमुळे सध्या सीबीआयकडून रियाची सतत चौकशी केली जात आहे. रियाचे सर्व ड्रग चॅट ईडीने नारकोटिक्स ब्युरोला दिले आहेत. यात ईडीने कथित ड्रग डीलर गौरव आर्याचीही चौकशी केली. ईडीनंतर एनसीबीही गौरवची चौकशी करेल. या सगळ्यात रियाला अटक करण्याची चार मुख्य कारणं एनसीबीकडे आहेत. अवैधरित्या ड्रग्ज घेणं, अवैध्यरित्या ड्रग्ज दुसऱ्याला देणं, अवैध्यरित्या ड्रग्ज विकत घेणं आणि ड्रग्जच्या व्यापारात सहभागी असणं. यातील कोणत्याही घटनांमध्ये पुरावा आढळल्यास एनसीबी रिया चक्रवर्तीला अटक करू शकते हे जवळपास निश्चित आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hM39A9