Full Width(True/False)

सुशांतच्या नावावर रजिस्टर नव्हते त्याचे सिम कार्ड

मुंबई- बॉलिवूड अभिनेता जितके सिमकार्ड वापरायचे त्यातलं एकही सिम कार्ड त्याच्या नावावर नव्हतं. यातलं एक सिम कार्ड त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानीच्या नावावर रजिस्टर होतं. सध्या बिहारची टीम सुशांतच्या कॉल डिटेल रेकॉर्डवर लक्ष ठेवत आहे. यासोबतच त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या कुटुंबियांशीही बोलणार आहे. दिशाचा मृत्यू सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधी झाला होता. याआधी बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी या चौकशीत मुंबई पोलिसांच्या असहयोगाबद्दल बोलताना म्हणाले की, ‘आमच्याकडे अजूनपर्यंत पोस्टमॉर्टम रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज या अशासंबंधीची कोणतीही माहिती मुंबई पोलिसांनी दिली नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की त्यांनी मुंबई पोलिसांना बिहार पोलिसांना सहकार्य करण्यास सांगावं.’ यासोबतच बिहार पोलिसांना या प्रकरणाचा सीबीआय तपास व्हावा असं वाटतं का, या प्रश्नाचं उत्तर देताना डीजीपी म्हणाले की, ‘आम्ही निष्पक्ष चौकशी करण्यात सक्षम आहोत. आम्हाला आशा आहे की आम्हाला साथ देईल आणि हे प्रकरण आम्ही सोडवू.’ सुशांतसिंह राजपूतचे वडील यांच्यावतीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पटणात एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत आली. याशिवाय या प्रकरणाची ईडीकडूनही चौकशी करण्यात येणार आहे. सुशांतसिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्रे येथील त्याच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. पण त्याने ही आत्महत्या का केली या मागची कारणं सध्या शोधण्यात येत आहेत. आतापर्यंत ४१ हून अधिक लोकांचे यासंबंधीचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यात सुशांतच्या कुटुंबियांपासून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे. बिहार पोलिसांना मिळत नाही मुंबई पोलिसांकडून मदत सध्या बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत आली असून सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची ते चौकशी करत आहेत. यात मुंबई पोलीस बिहार पोलिसांना मदत करत नसल्याचं म्हटलं जात आहे. बिहार टीमला लीड करण्यासाठी मुंबई पोहोचलेल्या पटणाचे एसपी विनय तिवारी यांनाही मुंबईत एका गेस्ट हाउसमध्ये जबरदस्ती क्वारन्टीन करण्यात आले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31fHYPN