Full Width(True/False)

तपास कुणीही केला तरी सत्य बदलणार नाही; रियाच्या वकिलांची प्रतिक्रिया

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आत्महत्या प्रकरणात सध्या बरेच ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या असून तपासाला वेग आला आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडं सोपवण्यात आला आहे.सुशांतचे वडील कुंदन कुमार यांनी सुशांतची गर्लफ्रेंड हिनं त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत बिहार येथील न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी बिहार पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले होते. परंतु मुंबई पोलिस आणि बिहार पोलिस यांच्या वाद झाल्यानं अखेर सर्वौच्च न्यायालयानं प्रकरणाचा तपास सीबीआयकडं देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर रियाच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली असून रिया सीबीआय तपासात पूर्णपणे सहकार्य करेल असं, त्यांनी म्हटलं आहे. रियाचे वकिल अॅड. यांनी सर्वौच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस आणि ईडी कडून करण्यात येत होता. त्यांना सहकार्य केलं त्याच प्रमाणं रिया सीबीआय चौकशी आणि तपासाला सामोरं जाण्यासाठी तयार आहे, ती सीबीआय तपासात पूर्ण सहकार्य करेल', असं त्यांनी म्हटलं आहे. तपास सीबीआयकडं गेला असला तरी, सत्य बदलणार नाही', असंही मानेशिंदे यांनी म्हटलं आहे. बिहार पोलिस चौकशीसाठी मुंबईत आल्यानंतर रिया चक्रवर्तीनं तपास मुंबईतच वर्ग करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात तातडीची याचिका केली होती. दरम्यान, बिहार सरकार या प्रकरणाचा तपास करण्याची शिफारस करण्यास सक्षम असल्याचंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकार मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणार आहे. मुंबई पोलिसांनी तपास केलेला नसून केवळ चौकशी केली आहे, असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण पूर्णपणे सीबीआयकडं सोपवलं आहे. या पुढं या प्रकणात कोणताही एफआयआर दाखल झाल्यास तो सीबीआयच पाहण्याचं काम करेल असेही सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. रियाला हे प्रकरण मुंबईतच हवे होते बिहारमध्ये दाखल करण्यात आलेले हे प्रकरण मुंबईत ट्रान्स्फर व्हावे अशी मागणी करणारी याचिका रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात सादर केली होती. सुप्रीम कोर्टात ११ ऑगस्ट या दिवशी या याचिकेवर सुनावणी झाली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YvTK8v