Full Width(True/False)

विरुष्काच्या ‘गुड न्यूज’ची सोशल मीडियावर जादू; मोडला 'हा' विक्रम

मुंबई: अभिनेत्री आणि या जोडीनं सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सुखद धक्का दिला. अनुष्का आणि विराट कोहली यांनी स्वतः सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सर्वांना ही गुड न्यूज दिली .'जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार', अशी ओळ लिहित विरुष्कानं एक फोटो पोस्ट केला आहे. अनुष्काच्या आई होण्यावरुन गेल्या काही दिवसांत बऱ्याच चर्चा ऐकायला मिळत होत्या. विरुष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनुष्काकडं 'गुड न्यूज' असल्याचं बोललं जात होतं. अनुष्कानं मात्र त्या अफवा असल्याचं वारंवार स्पष्ट केलं होतं. मात्र आता घरात चिमुकला पाहुणा येणार असल्याची चाहूल लागली आहे. त्यांनी स्वतः चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. विराट-अनुष्का ही जोडी ११ डिसेंबर २०१७ रोजी बोहल्यावर चढली होती. या गोड बातमीमुळे सध्या या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनुष्का आणि विराट यांनी सोशल मीडियावर ही गोडी बातमी शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्या दोघांना शुभेच्छा दिल्याय. विरुष्काच्या या गोड बातमीचा सोशल मीडियावर देखील गोड विक्रम झाला आहे.आतापर्यतं सेलिब्रिटींकडून करण्यात आलेल्या खास घोषणांच्या पोस्टमध्ये विरुष्काच्या या फोटोला सर्वांत जास्त लाईक्स मिळाले आहेत. त्यांच्या या पोस्टला आतापर्यंत १५.३ दशलक्ष लाईक्स मिळालेत. संदर्भ द्यायचा तर, गिगी हदीदच्या प्रेग्नन्सी फोटोलाला सर्वाधिक ८.२ दशलक्ष, जस्टिन बिबर आणि हॅली बाल्डविन यांच्या साखरपुड्याच्या पोस्टला १३.४ दशलक्ष, सेलेना गोमेजच्या फ्लोरेन्समधील सुट्टीच्या फोटोंना १४.२ दशलक्ष, सेलेना गोम्जच्या फ्लॉरेन्स येथील सुटीच्या फोटोंना १४.५ दशलक्ष, ड्वेन जॉनसनच्या लग्नाच्या फोटोंना १४.६ दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत. अनुष्का आणि विराट दोघंही पहिल्यांदा २०१३ मध्ये एकमेकांना भेटले होते. तेव्हा एका जाहिरातीत त्यांनी एकत्र काम केलं होतं. यावेळी दोघांची चांगली मैत्री झाली आणि दोघं एकमेकांसोबत चांगला वेळ काढू लागले. लवकरच ते एकमेकांना डेटही करू लागले होते. जानेवारी २०१४ मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून भारतात परत आली तेव्हा तिथं विराटसोबत अनुष्काही होती. तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये दोघांनी इटलीमध्ये राजेशाही थाटात लग्न केलं. सध्या विराट आयपीएलसाठी यूएईला गेला आहे. करोनामुळं तो जवळपास पाच महिने घरी होता. दोघांनी एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ या काळात शेअर केले. या लॉकडाउनच्या काळात अनुष्का आणि विराटने एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवला. या लॉकडाउनच्या काळात विराट पूर्णपणे आयसोलेशनमध्ये होता. युएईला जातानाही त्याने टीमसोबत न जाता स्वतःच्या खासगी विमानानं युएईला जाणं सोईस्कर मानलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hDqNyT