Full Width(True/False)

सुशांतला एकट्याला सोडून निघाल्याचं रियाने सांगितलं कारण

मुंबई- प्रकरणी रिया चक्रवर्तीच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सुशांत आणि रिया अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतच्या निधनाच्या सहा दिवसआधी तिने ८ जूनला सुशांतचं घर सोडलं आणि स्वतःच्या घरी आली. दोघांमध्ये वाद झाल्यामुळेच तिने सुशांतचं घर सोडल्याचं म्हटलं जात आहे. स्वतः सुशांतने रियाला तिच्या घरी जाण्यास सांगितल्याचं रियाने याआधी स्पष्ट केलं. आता यावर रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंद यांनी स्पष्टीकरण देताना रियाने सुशांतचं घर का सोडलं याचं कारणं सांगितलं. एका मुलाखतीत रियाच्या वकिलांनी सांगितले की ८ जून रोजी रियाला सुशांतला एकटं सोडायचं नव्हती. तशी तिची अजिबात इच्छा नव्हती. पण सुशांतनेच तिला निघून जायला सांगितल्यामुळेच ती त्याच्या घरातून निघाली. सुशांतने आपल्या कुटूंबाला भेटण्यासाठी अनेकदा फोनही केला होता. सुशांतच्या फोनच्या काही दिवसांनंतर त्याची बहीण मीतू त्याच्यासोबत रहायला आली होती. या काळात रियाचीही मानसिक स्थिती फारशी चांगली नव्हती. तिलाही पॅनिक अटॅक येत होते. सुशांतच्या वागण्यातील अचानकच्या बदलांमुळे तिच्या अडचणीत भरच पडत होती. रियाच्या वकिलांनी पुढे सांगितलं की, 'सुशांत आपल्या कुटुंबाला फोन करून मुंबई बाहेर जाण्याचा निर्णय सांगत होता आणि त्यांना मुंबईत येण्याची विनंतीही करत होता. सुशांतने अनेक फोन केल्यानंतर आणि विनवणी केल्यानंतर त्याची बहीण मितू ८ जून २०२० रोजी त्याच्यासोबत रहायला आली. त्यानंतर सुशांतने रियाला तिच्या घरी जाण्यास सांगितलं. दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी सोशल मीडियावर मोहीमही राबवण्यात येत आहे. सुशांतची बहीण श्वेतासिंह किर्तीने यासंबंधीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तसेच महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणात सहकार्य न केल्याचा आरोप बिहार पोलिसांनी केला. आता या प्रकरणाची चौकशी कोण करेल, याचा निर्णय सर्वोच्च न्यायलय देणार आहे. नव्याने जारी केलेल्या स्टेटमेन्टमध्ये नक्की काय म्हणाली - रिया आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही आणि ती त्यांना कधीही भेटली नाही. - रियाचं मौन म्हणजे ती दुर्बल आहे असं समजू नये. सुशांतचं कुटुंब शिक्षित आहे आणि या कुटुंबात ओपी सिंह हे आयपीएस अधिकारी आहेत. कुटुंबियांकडून करण्यात आलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. - बिहार पोलिसांचं एफआयआर पूर्णपणे राजकीयदृष्टीने तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे रिया बेकायदेशीर तपासणीचा भाग होऊ शकत नाही. - अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासणीत ती सहकार्य करत आहे. मुंबई पोलीस आणि ईडी या दोघांनाही रियाची सर्व आर्थिक कागदपत्रं सोपविण्यात आली आहेत. या कागदपत्रातून तिच्यावर झालेले आरोप खोटे असल्याचं स्पष्ट करतात. - रियाच्या खात्यांसह इनकम टॅक्स रिटर्नची तपासणी ईडीने केली आहे. या तपासणीत त्यांना रियाविरुद्ध कोणताही पुरावा मिळाला नाही. - रियाने सुशांतच्या खात्यातून एक रुपयाही ट्रान्सफर केला नाही. त्याच्या सर्व इनकम टॅक्स रिटर्न्सची चौकशी पोलीस आणि ईडीने केली आहे. - रिया आणि सुशांतच्या कुटुंबियांचे संबंध आधीपासूनच चांगले नव्हते. - या स्टेटमेन्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की रियाला सीबीआय तपासणीत कोणतीही अडचण नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3haVICu