Full Width(True/False)

सुशांतच्या निधनानंतर विकी जैनसोबत ब्रेकअप? अंकिता लोखंडेचा खुलासा

मुंबई: अभिनेता याच्या आत्महत्येनंतर त्याच्या मागची कारणं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुशांतच्या वडिलांची त्याची गर्लफ्रेंड हिच्यावर गंभीर आरोप करत एफआयआर दाखल केली आहे. यानंतर या प्रकणाला वेगळं वळण आलं असून सुशांतची एक्स गर्लफ्रेंड देखील या सुशांतच्या आत्महत्येचं खरं कारण सर्वांसमोर यावं यासाठी पुढं आली आहे. अनेक वृत्त वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीतल तिनं सुशांतच्या आयुष्यासंदर्भात अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. सुशांतच्या निधनानंतर अंकिता देखील या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तिनं सुशांतसाठी अनेक पोस्ट शेअर केल्यात, त्यामुळं तिचा आणि यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चा केवळ अफवा असल्याचं तिनं एका मुलाखतीतल म्हटलं आहे. मी विकीला डेट करतेय, आणि त्याच्यासोबत खूष आहे, असंही अंकितानं स्पष्ट केलं आहे. सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताच्या आयुष्यात विकी जैन आला. अंकितानं काही महिन्यांपूर्वीच विकीसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. दोघांचा साखरपुडा देखील झाला असल्याच्या चर्चा आहेत. सुशांतच्या निधनानंतर विकीवर देखील नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्यामुळं त्यानं सोशल मीडियावरंच कमेंट सेक्शन बंद केलं होतं. दरम्यान, गेल्यावर्षभरापासून सुशांत त्याच्या कुटुंबियांपासून दूरराहत होता. त्यांच्या जास्त संपर्कात येत नव्हता. त्यामुळं त्याचे कुटुंबिय देखील काळजीत होते. पूर्वी सारखं तो त्याच्या बहिणींसोबतही बोलत नव्हता, असं अंकिता म्हणाली. इतकंच नाही तर तो सतत त्याचे फोन नंबर बदलत होता. सुशांतच्या वडिलांकडे देखील त्याचा फोन नंबर नसायचा. ते मला फोन करून त्याचा फोन नंबर मागायचे, असंही अंकितानं मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे. मी देखील ब्रेकअप झाल्यांतर त्याच्या संपर्कात नव्हते, त्यामुळं मलाही त्याच्याफोन नंबर माहित नव्हता, असं अंकितानं स्पष्ट केलं. सुशांतच्या स्वभात झालेल्या बदल त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात आला होता. त्याची तब्येत बरी नव्हती तेव्हा त्याची मोठी बहिण त्याला घरी घेऊन जाण्यासाठी आली होती. मात्र, सुशांतनं त्यांना घरी येणार नाही असं सांगत त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला होता. घरच्यांपासून तो दुरावला होता, असा खुलासा अंकितानं केला. महेश शेट्टीनंही केला खुलासा सुशांतच्या वडिलांनी एफआयआरमध्ये विरोधत केलेल्या आरोपांनाही महेशनं दुजोरा दिला आहे. रिया आणि तिची आई सुशांतच्या आयुष्यातील प्रत्येकगोष्टीत हस्तक्षेप करायची असं महेशनं म्हटलं आहे. रिया आणि तिच्या आईनं सुशांतच्या घरातील सर्व कर्मचारी बदलले होते. सुशांतला त्याच्या घरच्यांसोबत बोलण्यातही दोघींनी बंधनं असायची. मित्र किंवा घरच्यांच्यासोबत बोलल्या नंतर सुशांत त्याचा फोन रिसेट करायचा असं महशे शेट्टीनं बिहार पोलिसांना सांगितलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Po9zJi