Full Width(True/False)

कंगनाचा पलटवार, 'लक्षात ठेव बाबर हे मंदिर पुन्हा बांधलं जाईल'

मुंबई- बीएमसीने आज कंगना रणौतच्या ऑफिसचा बहुतांश भागावर हातोडा चालवला. तिचं अनेक वर्षांचं स्वप्न उद्ध्वस्त केलं. आता, उच्च न्यायालयाने बीएमसीला बांधकाम पाडण्याची बंदी घातली आहे. याआधीही कंगनाने ती या सर्व गोष्टींना घाबरणार नसून हिंम्मतीने या सर्वाचा सामना करेल असं स्पष्ट केलं आहे. चुकीच्या प्रत्येक गोष्टीवर मी ठामपणे बोलणार असंही कंगना यावेळी म्हणाली. कंगनाने तिचं ऑफिस फक्त ऑफिस नसून तिच्यासाठी असल्याचं सांगितलं. यावेळी कंगनाने स्पष्ट केलं की, तिचं ऑफिस ही फक्त एक इमारत नसून तिच्यासाठी राम मंदिर आहे. याबद्दलचं ट्वीट करताना तिने लिहिलं की, 'अयोध्याची घोषणा मणिकर्णिका सिनेमाच्यावेळी केली. ही माझ्यासाठी फक्त इमारत नाही, तर राम मंदिर आहे, आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होईल.. राम मंदिर पुन्हा तुटेल पण बाबर एक गोष्ट लक्षात ठेव हे मंदिर पुन्हा बांधलं जाईल.. हे मंदिर पुन्हा बांधलं जाईल.. जय श्री राम.. जय श्री राम.. जय श्री राम..' घराबाहेर पडताना कंगनाने सकाळी ट्विटरवर घोषणा केली होती की, 'मी राणी लक्ष्मीबाईंचं धैर्य, पराक्रम आणि त्याग हे सिनेमातून जगले आहे. दुःखाची बाब म्हणजे मला महाराष्ट्रात येण्यापासून रोखलं जात आहे. मी राणी लक्ष्मीबाईंच्या पावलांवर पाऊल ठेवून चालेन. मी वाकणार नाही. मी चुकीच्या गोष्टींविरोधात बोलतच राहीन. जय महाराष्ट्र, जय शिवाजी.' कंगनाने लिहिले की, 'मुंबई हे माझं घर आहे. मला माहितीये की महाराष्ट्राने मला सर्व काही दिलं आहे. पण शिवाजी महाराजांच्या या भूमीला मीही एक अशी मुलगी दिली आहे जी महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या अस्मितेसाठी स्वतःचं रक्तही देऊ शकते. जय महाराष्ट्र..' तसेच कंगनाच्या आईने सांगितले की, 'मी माझ्या मुलीला शस्त्र आणि शास्त्र या दोघांचंही प्रशिक्षण दिलं आहे.' महाराष्ट्र सरकारसोबतचा कंगना रणौतचा लढा आता अधिक तीव्र झाला आहे. मुंबई पोलिसांसाठी पाकव्याप्क काश्मीरची उपमा देऊ कंगना थेट शिवसेनेच्या निशाण्यावर आली. याआधीच कंगनाच्या कार्यालयाची महापालिकेकडून तोडफोड करण्यात आली. ही कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने कंगनाच्या ऑफिसच्या बाहेर नोटीस चिकटवली आणि तोडफोड करायला सुरुवात केली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3k1JH3i