भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. तसेच शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो. कितीही मोठे झालो, तरी प्रत्येकाला शाळेतले शिक्षक आजही लख्ख आठवतात. आजच्या शिक्षक दिनानिमित्त, काही कलाकारांनी सांगितलेल्या त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांच्या काही आठवणी आणि आठवणींतले शिक्षक.

`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।` भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. कोणतीही व्यक्ती ही कायम विद्यार्थीच असते, असे म्हणतात. प्राथमिक गोष्टी आई शिकवते. समाजात वावरण्यापासून ते मनगट बळगट करण्यापर्यंतचे शिक्षण शिक्षक देत असतात. यानंतर खुल्या जगात गेल्यावर स्काय इज द लिमिट, अशी अवस्था सर्वांची होते.


मराठी सेलिब्रिटींनी सांगितल्या शाळेतल्या शिक्षकांच्या आठवणी

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. तसेच शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो. कितीही मोठे झालो, तरी प्रत्येकाला शाळेतले शिक्षक आजही लख्ख आठवतात. आजच्या शिक्षक दिनानिमित्त, काही कलाकारांनी सांगितलेल्या त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांच्या काही आठवणी आणि आठवणींतले शिक्षक.



​कॅन्सर...तरीही अखंड शिकवणं
​कॅन्सर...तरीही अखंड शिकवणं

शाळा हा माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. आमच्या शाळेतले आमचे सर्वच शिक्षक आम्हाला फार आवडायचे. पहिली ते पाचवी आणि नंतर सहावी ते दहावी जे शिक्षक आम्हाला शिकवायचे त्यांच्याशी आदराचं आणि मैत्रीपूर्ण नातं होतं. शाळेच्या आठवणी सांगताना एक हृदयस्पर्शी आठवण सांगावीशी वाटते, ती म्हणजे आमच्या पिल्ले मॅडमची. त्या आम्हाला गणित शिकवायच्या. नववीतून दहावीत गेल्यावर गणिताची चांगलीच भीती असते. पण, ती आमच्या मनात कधीही आली नाही. त्याला कारण पिल्ले मॅडम होत्या. आम्ही दहावीत गेलो तेव्हा त्यांना कर्करोग झाल्याचं आम्हाला कळलं. दहावीत गेलेल्या किंबहुना कुठल्याच विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये, म्हणून उपचार सुरू असताना, केमोथेरपी घेत त्या आम्हाला आमच्या दहावीच्या पूर्वपरीक्षेपर्यंत शिकवत होत्या. आमचे जादा वर्ग घेऊन आमच्या मनातल्या गणित या विषयातल्या सर्व शंकांचं निरसन केलं होतं. आमच्या दहावीनंतर त्यांचं निधन झालं. पण, त्यांनी दिलेली जिद्द आणि चिकाटी माझ्यासोबत अजूनही आहे. त्यांनी ज्या जिद्दीनं शिकवलं तीच जिद्द आज माझ्या आयुष्यातही आहे.

-सोनाली कुलकर्णी



​घाबरवायला गेलो अन्
​घाबरवायला गेलो अन्

डहाणूच्या जवाहर नवोदय विद्यालयात मी दोन वर्ष होतो. ते बोर्डिंग स्कूल असल्यामुळे शिक्षक आणि त्यांचे कुटुंबियसुद्धा तिथेच राहायचे. ही शाळा तशी गावापासून लांब, खूप आतल्या भागामध्ये होती. त्यामुळे आजूबाजूला भरपूर झाडं, भयाण शांतता असायची. तेव्हा आम्हाला हिंदीच्या शेणॉय मॅडम होत्या. जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे त्या घरी चालल्या होत्या. तेवढ्यात माझ्या मित्राचं ठरलं, की आज मॅडमना घाबरवायचं. मग माझ्याच पावडरच्या डब्यातील भरपूर पावडर तोंडाला फासून आणि अंगावर चादरी घेऊन आम्ही सर्व निघालो. त्यांच्याबरोबर त्यांची लहान मुलगीसुद्धा होती. त्यामुळे मला असं वाटलं, की घाबरवायचा बेत रद्द करू. तेवढ्यात कुणीतरी मला मागून धक्का दिला आणि आम्ही सर्वच त्या अवतारात मॅडमसमोर आलो. त्या दोघीही प्रचंड घाबरल्या. आम्हा सर्वांना त्यानंतर मोठ्या शिक्षासुद्धा झाल्या.

- ललित प्रभाकर



​संस्कृत शिकलो
​संस्कृत शिकलो

ठाण्यातल्या बेडेकर विद्यामंदिर शाळेचा मी विद्यार्थी आहे. तेव्हा आम्हाला संस्कृत शिकवायला धोंडे सर होते. संस्कृत काही माझ्या आवडीचा विषय नव्हता. परंतु, तो शिकण्यावाचून काही पर्यायही नव्हता. धोंडे सरांचे ठाण्यात क्लासेसही चालत. विशेष म्हणजे कधीही त्यांच्या क्लासला गेलो, की ते कुणालाही उपाशी घरी पाठवत नसत. सर्वांसाठी वडापाव, समोसा, सॉफ्टड्रिंक असं मागवायचे आणि भरपूर खाऊ घालायचे. संस्कृत विषयाची गोडी लागणं हा त्यामागचा मूळ हेतू असायचा. त्यांच्याकडे शिकू लागल्यावर हळूहळू माझा संस्कृत विषय चांगला होऊ लागला. भाषेवर प्रभुत्व येऊ लागलं. आज मी कला क्षेत्रात काम करतोय, ते भाषेचा अभ्यास चांगल्या प्रकारे झाल्यामुळेच. 'होणार सून मी या घरची'च्या सेटवर माझं शूटिंग बघायला ते यायचे. तेव्हा त्यांनी एक छोटी भूमिकादेखील केली होती.

- शशांक केतकर



​समूहगायनासाठी प्रोत्साहन
​समूहगायनासाठी प्रोत्साहन

घरची मंडळी लहानपणी माझी सगळी तयारी करून घेऊन मला वक्तृत्व स्पर्धा, कविता वाचन अशा स्पर्धांसाठी पाठवायचे. पण, मला कधीही स्टेजवर जाऊन बोलता यायचं नाही, इतकी मला स्टेजची भीती वाटायची. तिसरीत असताना एकदा शाळेच्याच एका कार्यक्रमात आमचं समूहगान सुरू होतं. मी तेव्हा गात होतो. आम्हाला संगीत विषय शिकवायला नवीन बाई आल्या होत्या. गायन संपल्यावर त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, 'गाताना पाहिलं मी तुला, खूप छान गातोस तू. यंदाच्या समूहगायन स्पर्धेत तू भाग घे.' त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. मी गाणं तयार केलं खरं. पण स्टेजवर जाऊन गायची भीती मनात होतीच. तरीही, त्यांनी वर्गात सर्वांसमोर मला ते गाणं गायला लावलं. नंतर सर्व विद्यार्थ्यांना विचारलं, की यानं गायन स्पर्धेत भाग घायला पाहिजे की नाही? सगळीच्या सगळी ७० मुलं मोठ्यानं जेव्हा 'हो' म्हणाली, तेव्हा मला खूप छान वाटलं. आज मी जो काही रंगभूमीवर काम करू शकतोय, त्या सर्वाची सुरुवात या संगीताच्या बाई, एस्थर खान यांच्यामुळेच झाली असं मला वाटतं.

- निपुण धर्माधिकारी





from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Z5wzC0