Full Width(True/False)

अनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून समन्स जारी

मुंबई: अभिनेत्री हिनं चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तन केल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणी याच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून लवकरच त्याची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. पायल घोषसोबत गैरवर्तन आणि लैंगिक शोषण केल्या प्रकरणी मुंबई पोलिसाकडून अनुरागला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आला आहे. उद्या सकाळी ११ वाजता अनुरागला चौकशीसाठी वर्सोवा पोलिस ठाण्यात बोलवण्यात आलं आहे. काय आहे प्रकरण? पायल घोषनं एक ट्विट करत अनुरागवर गंभीर आरोप केले आहेत. अनुरागनं माझ्यासोबत असभ्य वर्तन केलं असून मला वाईट वागणूक दिली होती. या व्यक्तीवर कारावाई करा तेव्हाच या माणसाचं खरं रुप समोर येईल. या ट्विटमुळं माझ्या जीवाला धोका असून माझी मदत करा, असं म्हणत तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी पायलची भेट घेतली आहे, तसंच, दोघांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अनुराग कश्यपविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. अनुरागच्या वकिलांनी जारी केलं पत्रक एक पत्रक जारी करत अनुरागच्या वकिलांनी त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. 'माझ्या अशीलावर लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे करण्यात आलेले आरोप चुकीचे असून यामुळं त्यांना दु:ख झालं आहे. हे सर्व आरोप हे बिनबुडाचे, खोटे आहेत. महिलांवर होणारे अत्याचार समोर यावेत यासाठी सुरू झालेली 'मी टू' चळवळ सध्या स्वत:च्या सोयीप्रमाणं स्वार्थासाठी वापरली जात असून यामुळं समोरच्या व्यक्तीचं चारित्र्यहनन होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून हे खोटे आरोपच या चळवळीला कमकुवत बनवताय', असं अनुरागच्या वकिलांनी म्हटलं आहे. दरम्यान, अनुरागनं देखील काही ट्विट करून देखील पायल घोष हिनं केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यानं ट्विट करत हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. आणखी आक्रमणं व्हायची आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे. अनेकांचे फोन आले, की काही बोलू नकोस,शांत बस. हे पण माहित आहे की, माहित नाही कुठल्या दिशेनं बाण येणार आहेत', असं अनुरागनं त्याच्या ट्विटमध्ये आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ig6PJZ