Full Width(True/False)

ट्रोलिंगला कंटाळून कलाकारांचा सोशल मीडियाला रामराम

मुंबई टाइम्स टीम ट्रोलिंगला, नकारात्मकतेला कंटाळून कलाकार सोशल मीडियाला रामराम ठोकू लागल्याचं चित्र दिसून येऊ लागलं आहे. यानं ट्विटर सोडणार असल्याचं जाहीर करताच मनोरंजनसृष्टीत यावरुन चर्चेला जोर आला. कलाकारांनी सोशल मीडियाबाबत नाराजी व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मराठी-हिंदी सिनेजगतातील काही कलाकारांनी सोशल मीडियावरुन एक्झिट घेतली आहे. तर काही कलाकार तात्पुरते सोशल मीडियापासून लांब गेले आहेत. ट्रोलिंगवरुन ट्रोलर्सना खडे बोल सुनावले होते. 'आता बस्स झालं. सोशल मीडियावर हल्ली आपण बराचसा वेळ घालवत असल्यानं सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. मलादेखील विविध कारणांवरुन सोशल मीडियातून त्रास दिला जात आहे. परंतु यापुढे जर कोणी खोटी, अपमानास्पद, अश्लील आणि बेजबाबदार कमेंट केली तर मी कायदेशीर तक्रार करेन. यात माझ्या स्पॅम मेसेजचाही समावेश असेल. आम्ही सेलेब्रिटी आहोत, म्हणून वाट्टेल ते आमच्याबद्दल बोललं जातं हे माझ्या निर्दशनास आलं आहे. माझ्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक निर्णयाबद्दल कोणालाही भाष्य करण्याचा किंवा न्याय करण्याचा अधिकार कोणालाही देत नाही आणि मलाही (जे कलाकारांचे चाहते आहेत) कोणताही अधिकार नाही, की मी दुसऱ्याच्या आयुष्यातील निर्णयावर बोलेन', असं अभिज्ञानं तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं होतं. सोशल मीडियावरील नकारात्मकतेला चाप लावण्याची प्रतिक्रिया सर्वच क्षेत्रांतून उमटत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील काही कलाकारांनी सोशल मीडिया सोडून दिला. तर #stophateforprofit या हॅशटॅगचा वापर करुन सेलिब्रिटींनी सोशल मीडियामुळे येणाऱ्या नकारात्मकतेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स स्वत:च्या फायद्यासाठी लोकांचा वापर करत आहे आणि नकारात्मकता पसरवत आहे, अशी खंत अनेक सेलिब्रिटींनी बोलून दाखवली आहे. सोशल मीडिया आणि ट्रोलिंग हा कलाकारांसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो आहे. ही बाब गेल्या काही दिवसांमध्ये ठळकपणे अधोरेखित झालीय. , साकीब सालीम, आयुष शर्मा, आशा नेगी यासारख्या हिंदीतील कलाकारांनी सोशल मीडियापासून ब्रेक घेतलाय. सावधान राहूनच कलाकार काहीही बोलले, की त्यांच्यावर वाट्टेल तशी चिखलफेक करायची आणि जर काहीही बोलले नाहीत, तर कलाकारांना समाजभान नाही असंही म्हणायचं, यावरुन कलाकारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे कोणत्याही बाबतीत मत व्यक्त करताना कलाकार सावधानता बाळगत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mSaZLC