Full Width(True/False)

‘इतनी शक्ती हमें देना दाता...’गाण्याचे गीतकार अभिलाष यांचं निधन

मुंबई: सुप्रसिद्ध यांचं आज निधन झालं. गेल्या काहीमहिन्यांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. अखेर सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ‘अंकुश’ या हिंदी चित्रपटातील ‘...’ ही यांच्या लेखणीतून उमटलेली प्रार्थना प्रचंड गाजली. तसंच 'संसार है एक नदीया', 'आज की रात ना जा' या गाण्यांचं गीतलेखन केलं होतं. तसंच त्यांनी पटकथा आणि संवाद लेखक म्हणूनही योगदान दिलं आहे. यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलंय. अभिलाय यांना यकृताचा कर्करोग होता. गेल्या दहा महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. पण आर्थिक कारणांमुळं त्यांच्यावर उपचार करण्यास अडचणी येत होत्या. त्यांच्या पत्नी नीरा अभिलाष यांनी इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटी (आयपीआरएस) कडे तातडीनं आर्थिक मदत मागितली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/343UFyO