मुंबई- सीझन १४ चा तिसरा आठवडा भावनिक आणि धक्कादायक अशा दोन्ही पातळीवर सुरू झाला. बिग बॉसने घराला गौहर खानची टीम, हिना खानची टीम आणि सिद्धार्थ शुक्लाची टीम अशा तीन संघात विभागले. शोमध्ये स्पर्धकांनी स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी सीनिअर जे म्हणतील त्या पद्धतीने वागण्याचं ठरवलं. जे टास्क गमावतील त्यांना घराच्या बाहेर पडावं लागणार हे बिग बॉसने सांगितल्यामुळे प्रत्येकजण जीव ओतून टास्क करत होता. शेवटी हिनाची टीम जिंकली. तर निक्की तांबोळी, पवित्र पुनिया आणि एजाज खान यांचा समावेश असलेल्या सिद्धार्थची टीम हरली. पहिल्या आठवड्यात निक्की सुरक्षित स्पर्धक असल्यामुळे ती यावेळी घराच्या बाहेर गेली नाही. शेवटी सिद्धार्थसोबत पवित्र आणि एजाज यांना घराच्या बाहेर पडावं लागलं. दरम्यान, बिग बॉसने रेड झोन नावाचा नवीन भागही घरात तयार केला. पवित्र आणि एजाज हे त्या भागात जाणारे पहिले स्पर्धक होते. तसेच या झोनमध्ये येणाऱ्या स्पर्धकांवर घरातून बाहेर जाण्याचा धोका कायम राहील. असं असलं तरी त्यांना ग्रीन झोनमध्ये परत येण्याची संधीही देण्यात येईल. या आठवड्यात प्रेक्षकांनी पहिलं कॅप्टन पदासाठीचं टास्कही पाहिलं. पवित्र आणि एजाज दोघंही बाहेर राहून हा टास्क पाहत होते. टास्क संपल्यानंतर निशांतसिंग मलकानीला कॅप्टन म्हणून घोषित केले. असं असलं तरी निशांतची कॅप्टन्सी फक्त एक दिवस टिकली. कारण बिग बॉसने त्याच्या नेतृत्वात बरेच नियम मोडले असल्याचं निदर्शनास आणून दिलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oi7RJL