Full Width(True/False)

म्हणून दिल्लीत एकत्र फिरताना आजही शाहरुख गौरीला म्हणतो वहिनी

मुंंबई- बॉलिवूडचा किंग आज त्याचा ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान सिनेसृष्टीत येण्यापूर्वी सर्वसामांन्यांप्रमाणेच आयुष्य जगत होता. तसं पाहिलं गेलं तर शाहरुखकडे त्याच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी आहेत जो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करेल. पण त्यातही एक किस्सा फारच मजेशीर आहे. शाहरुखने स्वतः द कपिल शर्मा शोमध्ये हा किस्सा सांगितला होता. शाहरुख जेव्हाही दिल्लीत जातो तेव्हा बायकोला वहिनी म्हणून का हाक मारतो याचं कारण त्याने यावेळी सांगितलं. हा किस्सा दिल्लीतला आहे, जेव्हा एका टोळीने शाहरुखला मारले होते. शाहरुख म्हणाला की, 'मी ग्रीन पार्कमध्ये होतो. तेव्हा माझी एक नवीनच गर्लफ्रेंड झाली होती. खरंतर ती गर्लफ्रेंड नव्हती. आम्ही नुसतंच फिरायचो. त्याने सांगितले की एक दिवस जेव्हा शाहरुख त्या मुलीसोबत फिरत होता तेव्हा गुंडांचा एक गट तिथे आला. त्यातल्या एका मुलाने शाहरुखला विचारलं की ती कोण आहे. तर त्यावर शाहरुखने सेन्ट कोलंबोचा विद्यार्थी असल्यामुळे इंग्रजीमध्ये उत्तर देत म्हटलं की, ती माझी गर्लफ्रेंड आहे. यावर समोरचा मुलगा म्हणाला की, ती तुझी गर्लफ्रेंड नाही तर वहिनी आहे. शाहरुख पुढे म्हणाला की, त्याच्या गर्लफ्रेंडचे मित्र तिथपर्यंतच थांबले नाहीत तर त्यांनी त्यांच्या हातात असलेलं कुल्लड तोंडावर मारलं. या प्रसंगानंतर शाहरुख म्हणतो की तो आता दिल्लीत बायकोसोबतही कुठे फिरायला गेला तर तो गौरी खानला वहिनीच म्हणतो. शाहरुख खानने १९८८ मध्ये 'दिल दरिया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण या सिनेमाच्या निर्मितीला उशीर झाल्यामुळे त्याने मालिकेची ऑफर स्वीकारली. १९८९ मध्ये शाहरुख 'फौजी' मालिकेत दिसला. या मालिकेत त्याने अभिमन्यू राय ही व्यक्तीरेखा साकारली होती. या मालिकेनंतर त्याने सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35OcIcY