Full Width(True/False)

'आई माझी काळूबाई'मालिकेत वादाची ठिणगी; प्राजक्ताच्या जागी वीणा जगताप

मुंबई टाइम्स टीम '' या मालिकेतील मुख्य नायिका, म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडची मालिकेतून एक्झिट झाली आहे. निर्मिती संस्था आणि प्राजक्ता यांच्यामध्ये झालेल्या काही वादांमुळे तिनं मालिका सोडल्याचं समजतं. चित्रीकरणासाठी सेटवर उशीरा येणं, चित्रीकरणासाठी ऐन वेळी नकार देणं, सुट्टीसाठी परीक्षा किंवा अन्य काही कारणं देणं अशा काही गोष्टींवरुन निर्माते आणि अभिनेत्री यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं कळतं. त्यातून प्राजक्ता मालिकेतून बाहेर पडली असून, तिच्या जागी अभिनेत्री दिसणार आहे. मालिकेच्या निर्मात्या यांनी याबाबत सांगितलं, 'स्क्रिप्ट १५ दिवस आधी हवं, चित्रीकरणासाठी इतकेच दिवस देईन या प्राजक्ताच्या अटी होत्या. त्या पूर्ण करणं शक्य नव्हतं. तसंच या सगळ्यात तिच्या आईचा बराच हस्तक्षेप असे. या सगळ्यामुळे आम्हाला अत्यंत मनस्ताप झालाय. असा त्रास इतर निर्मात्यांना होऊ नये ही इच्छा आहे. यापुढे प्राजक्ताच्या जागी अभिनेत्री वीणा जगताप आर्याच्या भूमिकेत दिसेल.' याबाबत अभिनेत्री प्राजक्ताशी संपर्क साधला असता तिनं सांगितलं, 'पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची कोविड चाचणी केली नसेल, तर त्यांच्याबरोबर प्रवास कसा करायचा, एवढाच माझा मुद्दा होता. त्यासाठी मला शिवीगाळ केली गेली. मला हे अत्यंत चुकीचं वाटलं. तरीही मी दीड महिना शूटिंग केलं. सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर, मालिका चांगली असूनही नाइलाजास्तव ३१ ऑक्टोबरपर्यंतच काम करेन, असं निर्माते आणि वाहिनीला मी सांगितलं.' तिच्या या म्हणण्यावर अलका म्हणाल्या, की 'मालिकेतला एक जण फोनवर कुणाशीतरी बोलत असताना त्यानं काही अपशब्दांचा वापर केला. त्याच्या वागण्यावर प्राजक्ता आणि तिच्या आईनं आक्षेप घेतला. काही वेळा भावनेच्या भरात माणसाचा भाषेवर ताबा राहत नाही. तो त्याच्या वैयक्तिक गोष्टींबद्दल फोनवर बोलत होता. त्याच्याशी त्यांचा खरं तर काहीच संबंध नव्हता. तरी त्याचा मुद्दा बनवला गेला.' प्राजक्ताचं अशा प्रकारचं वागणं मालिकेच्या सेटवर अनेकांना खटकत असल्याचंही समजतं. प्राजक्ताच्या जागी येणाऱ्या वीणानं यापूर्वी 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतून लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर 'मराठी बिग बॉस'मुळेही ती चर्चेत होती. मालिकेचं चित्रीकरण साताऱ्याला असतं. संपूर्ण टीम तिथेच राहते. त्यामुळे सेटवर उशिरा येण्याची तक्रार कुणाच्याही बाबतीत होऊ शकत नाही. तसंच मालिका स्वीकारतानाच मी माझ्या परीक्षेबाबत सांगितलं होतं. पण, 'आपण चित्रीकरण करतोय. तुला परीक्षेसाठी जाता येणार नाही' असं मला सांगण्यात आलं. मी परीक्षा देऊ शकले नाही. या सगळ्या वातावरणात काम करणं शक्य नसल्याचं सांगून मी मालिका सोडली. - , अभिनेत्री परीक्षा असल्यामुळे चित्रीकरण करू शकत नाही असं कारण प्राजक्तानं अनेकदा सांगितलं आहे. पण, सध्याच्या काळात सतत कोणत्या परीक्षा होताहेत याबद्दल सगळ्यांनाच शंका आहे. शिवाय वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाण्यासाठीही ती सुट्टी मागायची. सेटवर अनेकदा ती उशीरा येत असे. चित्रीकरणासाठी अनेक सीनिअर कलाकार तासनतास तिची वाट बघायचे. तिच्या उशीरा येण्यानं अनेकदा चित्रीकरणाला उशीर झालाय. - अलका कुबल, निर्मात्या, आई माझी काळूबाई


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2JpinPf