Full Width(True/False)

सैल कपड्यांमुळे मारली होती थोबाडीत; करिश्मानं सांगितला धक्कादायक अनुभव

मुंबई: बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना करिश्मानं उद्योगपती याच्याशी लग्न केलं होतं. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात मतभेद झाले. प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं. अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर मागील वर्षी तिचा संजय कपूरशी रीतसर घटस्फोट झाला. घटस्फोट घेत असताना करिश्मानं पती आणि त्याच्या कुटुंबियांवर हिंसाचाराचे आरोप केले होते. यासंदर्भातला आणखी एक धक्कादायक अनुभव करिश्मानं नुकताच शेअर केला आहे. नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत करिश्मानं हा करणारा धक्कादायक अनुभव शेअर केलाय. मी नुकतीच आई झाले होते. गरोदरपणात आणि डिलिव्हरी नंतर माझं वजन वाढलं होतं. तयामुळं मी सैल कपडेच वापरायचे. यामुळं एका गेट टुगेदरमध्ये संजय एकदा माझ्यावर भडकला आणि त्यानं त्याच्या आईला माझ्या थोबाडीत मारण्यात सांगितलं. तिनं देखील भर कार्यक्रमात माझ्या कानाखाली लगावली होती, असा वेदनादायक अनुभव करिश्मानं सांगितला. दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरू दरम्यान, करिश्माच्या घटस्फोटानंतर वर्षभरातच तिच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. करिश्माला संजय कपूरपासून दोन मुलं आहेत. करिश्मा आणि संदीप तोषनीवाल यांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याचाही घटस्फोटित झाला आहे. त्यानं पत्नी अर्शिताला घटस्फोट दिला आहे. रणधीर कपूर यांची हरकत नाही! 'करिश्माला दुसरं लग्नं करायचं असेल तर माझी काहीच हरकत नाही. तिला माझा आशीर्वाद आहे. मी संदीपला ओळखत नाही. फक्त त्याचा फोटो पाहिलाय. पण करिष्मा त्याला चांगलं ओळखते. तिला संदीप योग्य वाटत असेल माझाही तिला पूर्ण पाठिंबा आहे', असं रणधीर कपूर यांनी म्हटलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32OXBzl