Full Width(True/False)

वडिलांच्या निधनानंतर लगेच गोव्याला गेली होती ईशा; सांगितलं त्यामागंच कारण

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री हिनं नुकताच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना ईशानं बिनधास्त उत्तरं दिली. ऋषीसोबत लग्न कधी करणार या प्रश्नावरही तिनं भन्नाट उत्तर दिलं तर वडिलांच्या निधनानंतर दोन दिवसांनी ती गोव्याला का गेली होती याचा खुलासाही तिनं केला. गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये २४ तारखेला ईशाचे वडिल यांचं निधन झालं.सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी तिनं चाहत्यांसोबत शेअर केली होती. पण त्यानंतर दहा दिवसांच्या आतचं तिनं गोव्याच्या समुद्र किनारी वेळ घालवत असतानाचे फोटो शेअर केले होते. वडिलांच्या निधनानंतर तिने गोव्यातील फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं, तसंच तिला काहींनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. पण तिनं चाहत्यांनी ट्रोलिंगला कोणतंही उत्तर दिलं नव्हतं. आता मात्र तिनं खुलासा केला आहे. इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी गप्पा मारताना ईशानं याबद्दलचा खुलासा केला आहे. 'बाबांना जाऊन १० दिवस पण झाले नाहीत, तू फिरायला गेलीस. त्यांचे अंत्यसंस्कार कसे आणि कुठे केले? असा प्रश्न एका चाहत्यानं ईशाल विचारला होता. 'बाबा नास्तिक होता. त्याच्या इच्छा नव्हती की आम्ही सुतक, अंत्यसंस्कार करावे. उलट, त्याची समुद्र किनारी जायची शेवटची इच्छा राहिली होती' असं उत्तर ईशानं चाहत्याच्या प्रश्नाला दिलं. लग्न कधी? एका चाहत्यानं 'तुम्ही लग्न कधी करणार आहात? असा प्रश्न विचारला असता, कोणाला घाई झालीय? असं ईशा म्हणाली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38iOfhu