मुंबई: अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीच उतरलेली मालिका म्हणजे ''. मालिकेतील कलाकारांचा अभिनय देखील चर्चेता विषय ठरत आहे. मालिकेत रोज नवीन काही रंजक असे ट्विस्ट पाहायला मिळत असल्यानं मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिका सध्या मंजुळा आणि डॉक्टर यांच्याभोवती फिरत असून मालिकेला एक वेगळच वळण लागणार आहे. मंजुळानं तिच्या घरात कोणाला लपवलं आहे? याचं उत्तर गावकऱ्यांना मिळालं असलं तरी यामुळं डॉक्टर अजित कुमार याची चांगलीच फजिती होते. गावकऱ्यांसमोर नाचक्की झाल्यानं अजित कुमार भयंकर चिडतो आणि कुठेतरी निघून जातो. दुसऱ्या दिवशी गावकरी अजित कुमारला गावभर शोधत असतात. पण तो कुठंच सापडत नाही. डॉक्टर सापडत नसल्याचा दोष गावकरी मंजुळाला देतात. तिच्यासोबत झालेल्या भांडणामुळं अजित कुमार गाव सोडून गेला, असं म्हणतात. डॉक्टरचा शोध घेण्यासाठी पोलिसही वाड्यात येतात. मंजुमुळेच अजित कुमार गायब असल्याचं गावकरी पोलिसांना सांगतात. त्यामुळं पोलिस मंजुळाला चौकशीसाठी घेऊन जातात.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37OOvV6
