Full Width(True/False)

...तोपर्यंत आमिर खान मोबाइन फोन वापरणार नाही; परफेक्शनिस्टचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : प्रत्येक कलाकार आपल्या चित्रपटासाठी, भूमिकेसाठी हवी ती मेहनत घ्यायला तयार असतो. आता हेच बघा ना बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता त्याच्या प्रत्येक भूमिकेसाठी दिवस रात्र मेहनत घेताना दिसतो. ‘दंगल’, ‘गजनी’ सारख्या चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका आणि त्यासाठी त्याने घेतलेली मोठ्या पडद्यावर दिसून आली. आता तो ‘’ चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. या चित्रपटाची तयारी करत असताना आमिरने एक वेगळाच निर्णय घेतला आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत आपला मोबाइल बंद ठेण्याचा निर्णय आमिरने घेतलाय. वाटलं ना तुम्हाला पण नवल. आपली प्रत्येक भूमिका आणि त्यामागची मेहनत प्रेक्षकांपर्यंत पोहचावी यासाठी आमिर हवं ते करायला तयार असतो. आताही या चित्रपटाची तयारी, चित्रीकरण करत असताना मध्ये अडथळा नको म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे. काम करत असताना मोबाइलमुळे अडथळा निर्माण होतो. शिवाय मोबाइलचा वापर करण्यातही बराच वेळ जातो असे आमिरचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत तरी आमिरचा मोबाइल बंद असणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. एखादा चित्रपट हातात घेतला की फक्त त्यावरच लक्ष केंद्रीत करायचं आणि भरपूर मेहनत करायची हे आमिरने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. या चित्रपटामध्ये आमिरबरोबरच अभिनेत्री करिना कपूर खानही काम करताना दिसणार आहे. पुन्हा एकदा आमिर-करिना एकत्र येणार आहेत. यावर्षी ख्रिस्मसच्या ऐनमोक्यावर ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल. विशेष म्हणजे याआधीही आमिरचे ख्रिस्मसला प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजले. यामध्ये ‘दंगल’, ‘पीके’ या चित्रपटांचा समावेश आहे. आता ‘लाल सिंह चड्ढा’कडे साऱ्या प्रेक्षकांच लक्ष लागून राहिलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oEerJi