मुंबई- ९० च्या दशकातील सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये एक नाव नेहमी घेतलं जातं, ते म्हणजे अभिनेत्री दिव्या भारतीचं. परंतु आज ती आपल्यात नाही. चाहते तिच्या सुंदरतेवर फिदा होते. तिच्या अभिनयाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर दिसून येते. अनेकांच्या मते, जर दिव्या आज जिवंत असती तर ती बॉलिवूडमध्ये प्रथम क्रमांकाची अभिनेत्री असती. २५ फेब्रुवारी रोजी दिव्याचा वाढदिवस असतो. दिव्याचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ साली मुंबईत झाला. तिच्या वडिलांचं नाव ओमप्रकाश होतं आणि ते एक विमा अधिकारी होते. त्यांच्या पत्नीचं नाव मीता भारती होतं. दिव्याच्या वडिलांची दोन लग्न झाली होती. दिव्या ही त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी होती. दिव्याने वयाच्या १९ व्या वर्षांपासून चित्रपटसृष्टीवर राज्य करायला सुरुवात केली होती. असं म्हटलं जातं की, दिव्या चित्रपटसृष्टीचा असा चेहरा बनली होती,ज्याला ज्याला पडद्यावर रडताना पाहून दगडालाही पाझर फुटेल. तिच्या अभिनयाची जादू संपूर्ण देशभरात पसरली होती. छोट्या मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सर्वजण तिचे चाहते होते.दिव्याच्या चित्रपटातील करिअरबद्दल बोलायचं झालं तर, तिने फक्त तीन वर्ष चित्रपटात काम केलं. पण या तीन वर्षाच्या कारकिर्दीत तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची जादू इतकी होती की, तिला एका वर्षात १४ चित्रपटाच्या ऑफर आल्या होत्या. '' या चित्रपटातील सिम्रनच्या भूमिकेसाठी आदित्य चोप्रा यांनी दिव्या भारतीला घेण्याचा निर्णय घेतला होता. 'दिवाना' आणि 'दिल आशना' या चित्रपटातील शाहरुख खान आणि दिव्याची जोडी प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. परंतु, १९९३ साली झालेल्या दिव्याच्या मृत्यूने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. ५ एप्रिल १९९३ च्या रात्री ११ वाजता तिच्या मुंबईतील तुलसी अपार्टमेंट इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडली आणि त्यातचं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली की ती हत्या होती, याबाबत आजतागायत तर्कवितर्क सुरु आहेत. १९९८ मध्ये मुंबई पोलिसांनी ही केस बंद केली. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झाला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37KixtX