मालिका आणि चित्रपट या माध्यमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री हिच्या '' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या रविवारी म्हणजे २१ मार्च ला झी टॉकीजवर होणार आहे. त्या निमित्ताने सायलीसोबत साधलेला खास संवाद...
  • लग्न संस्थेवर आधारलेल्या या चित्रपटात काम करताना तुझ्या मनात नेमकी कोणती भावना होती?
खरं सांगू, तर मला या चित्रपटाचा विषय खूप आवडला. यात जी भूमिका साकारली आहे ती मला खूपच भावली. लग्नसंस्थेवर आपण अनेकदा भाष्य करतो, पण एका शेतकऱ्याच्या मुलीचं लग्नावर प्रकाश टाकणारी ही कथा आहे. त्यामुळे हा उत्तम विषय मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या चित्रपटाला मी काहीच विचार न करता लगेच स्वीकारलं.
  • तुझ्या या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगशील.
मी या चित्रपटात स्वाती या एका शेतकऱ्याच्या मुलीची भूमिका साकारली आहे. तिने लहानपणापासून तिने वडिलांचा त्रास, त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत बघितली आहे. त्यामुळे तिला शेतकऱ्याशी नाही तर नोकरदार मुलाशीच लग्न करायचंय हे तिनं पक्क ठरवलं आहे. गावात रहात असूनही ही स्वाती शिकली आहे. त्यामुळेच फार भावनिक न होता खूप प्रॅक्टिकल विचार करणारी अशी आहे.
  • या व्यक्तिरेखेसाठी प्रेक्षकांकडून तुला कशा प्रतिक्रिया मिळाल्या?
खूपच चांगल्या प्रतिक्रिया या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून मिळाल्या. मनोरंजनासोबतच एक चांगला संदेश या चित्रपटाने दिला आहे, असा मला अनेकांनी मला आवर्जून सांगितले आणि ही भूमिका साकारल्याबद्दल खूप कौतुक देखील केलं आहे.
  • या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवरून प्रसारित होणार आहे त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील?
करोनाच्या काळानंतर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेला 'बस्ता' हा पहिलाच चित्रपट आहे. आणि त्याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आता झी टॉकीजवर २१ मार्चला होणार आहे. त्यामुळे मी रसिक प्रेक्षकांना ही विनंती करीन की या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या. आमच्यावर जसं आजपर्यंत प्रेम करत आला आहात तसंच करत राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
  • हा चित्रपट शूट करत असतानाचा एखादा ऑफ-स्क्रीन किस्सा जो तुम्ही प्रेक्षकांसोबत शेअर करू इच्छिता?
माझे सेटवर खूप लाड व्हायचे. मी एका वेगळ्या चित्रपटासाठी थोडं वजन वाढवलं होतं आणि बस्तासाठी मी एक गाणं शूट करत होती, ज्यात अक्षयला मला उचलून घ्यायचं होतं. त्यात असा सीन होता की मी धावत येते आणि मग अक्षय मला उचलून घेतो. हा एक रोमँटिक सीन असल्यामुळे आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर खूप रोमँटिक एक्सप्रेशन्स असणं अपेक्षित होतं. परंतु माझं वजन अक्षयला पेलेल की नाही याची साशंकता असल्यानं मी त्याला ते गाणं सुरू असताना हळूच सांगितलं की मला खाली पाडू नको बरं...नशीबानं तसं काही झालं नाही. पण ते आजही आठवून खूप हसू येतं.
  • सायली, एक व्यक्ती म्हणून लग्नसंस्थेवर तुझा किती विश्वास आहे ? मोठ्या डामडौलात जी लग्न समारंभ केले जातात त्याबद्दल तुला काय वाटतं?
माझा लग्न संस्थेवर विश्वास आहे. मला असं वाटतं की, लग्न सोहळा कसा असावा हा त्या प्रत्येक मुला-मुलीचा वैयक्तिक निर्णय आहे. काहींना खूप मोठ्या स्तरावर लग्न सोहळा केलेला आवडतो तर काहींना थोडक्यात आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न करायला आवडतं. ही प्रत्येकाची आपली आपली निवड आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rV4VnJ