Full Width(True/False)

‘नंबर पोर्टेबिलिटी’च्या संख्येत वाढ; तीन दिवसांत पोर्टेबिलिटी

म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्रातील शहरांत मिळणाऱ्या मोबाइल नेटवर्कमुळे ग्राहक त्रस्त असल्याचे दिसून आले आहे. २०१९-२० या अर्थिक वर्षात महाराष्ट्रातील एक कोटीहून अधिक नागरिकांनी ‘’चा पर्याय स्वीकारला असून, देशाच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) जाहीर केलेल्या वार्षिक अहवालात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. वाचाः गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शहरांमध्ये टेलिकॉम सेवेला कंटाळून पोर्टेबिलिटीद्वारे सेवा बदलणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते आहे. २०१९-२० या कालावधीत देशभरात सहा कोटी नागरिकांनी टेलिकॉम सेवेला पर्याय शोधला असून, त्यात महाराष्ट्रातील नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. मोबाइल नेटवर्कमध्ये सातत्याने येणारे अडथळे, इंटरनेटबाबत येणाऱ्या समस्या आणि पोर्टेबिलिटी करण्यासाठीची सुलभ प्रक्रिया यामुळे नागरिकांकडून हा पर्याय वापरला जात असल्याचे ‘ट्राय’च्या अहवालात दिसून आले आहे. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला, तर मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून मार्च २०२० पर्यंत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात सुमारे सहा कोटी नागरिकांनी नंबर पोर्टेबिलिटीचा पर्याय वापरला असून, ही संख्या राज्याच्या अर्ध्या लोकसंख्येजवळ जाणारी आहे. गेल्या अर्थिक वर्षात त्यात मोठी वाढ झाली असल्याचे चित्र आहे. वाचाः लॉकडाउन पूर्वीच्या काळापासूनच महाराष्ट्रात टेलिकॉम कंपन्यांच्या सेवांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आयडिया- व्होडाफोन यांच्या एकत्र येण्याने निर्माण झालेल्या समस्या; तसेच दिवसेंदिवस ‘बीएसएनएल’ची ढासळत चाललेली सेवा, एअरटेल, जिओ या कंपन्यांचे ग्राहक वाढल्याने त्यांच्या पायाभूत सुविधांवर आलेला ताण अशा अनेक गोष्टी याला कारणीभूत असल्याचे टेलिकॉम तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नंबर पोर्टेबिलिटीची अत्यंत किचकट प्रक्रिया आता सुलभ झाल्याने ग्राहकांना तातडीने ही सेवा मिळणे सोपे झाले आहे. तीन दिवसांत पोर्टेबिलिटी शक्य कोणत्याही नागरिकाला मोबाइल नंबर न बदलता केवळ सेवा देणारी कंपनी बदलायची असेल, तर तेही प्रक्रिया तीन दिवसांच्या आत पूर्ण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी १९०० या क्रमांकावर PORT आणि त्यापुढे मोबाइल क्रमांक लिहून एसएमएस केला, की ही प्रक्रिया सुरू होते. एसएमएस केल्यानंतर ग्राहकांना ‘पोर्टिंग कोड’ पाठवला जातो, तो कोड आणि ग्राहकांची ‘केवायसी’ कागदपत्रे ग्राहकांना हव्या असणाऱ्या टेलिकॉम कंपनीकडे दाखल करणे आवश्यक असून, त्यानंतर तीन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होते. ग्राहक टेलिकॉम कंपन्यांच्या सेवेने संतुष्ट नसल्यानेच नंबर पोर्टेबिलिटीची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे येत्या काळात टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या सेवा अधिक चांगल्या कराव्या लागतील. ग्राहकांना पर्याय उपलब्ध असल्याने येत्या काळात सेवांचा दर्जा वाढवण्याशिवाय पर्याय नाही. - मिलिंद पांडे, टेलिकॉम तज्ज्ञ वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ct63bP