Full Width(True/False)

दाक्षिणात्य कलाकारांकडून 'थलायवी' कंगनाचं कौतुक, बॉलिवूडकर मात्र गप्पच

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा आगामी चित्रपट ''चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. सध्या सोशल मीडियावर या ट्रेलरचीच चर्चा सुरू आहे. तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात कंगना रणौतनं जयललिता यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर कंगनाच्या अभिनयाचं जोरदार कौतुक सुरू आहे. यात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी सुद्धा मागे नाही अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी कंगनाचं कौतुक केलं आहे. पण बॉलिवूडकरांनी मात्र यावर एक अवाक्षरही काढलेलं नाही. त्यामुळे आता बॉलिवूडकरांच्या गप्प असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. थलायवी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर बॉलिवूडकरांचं गप्प राहणं जास्त महत्त्वपूर्ण ठरतं कारण त्या आधी काही दिवसांपूर्वीच आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. दोन्ही चित्रपट स्त्रीप्रधान आहे. असं असताना आलियाच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रियांका चोप्रा, नीतू कपूर, अक्षय कुमार, करण जोहर, वरुण धवन अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावरून तिचं कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र जेव्हा कंगनाच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला त्यावेळी हे सर्वच कलाकार यावर एकही शब्द बोललेले नाहीत. पण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी मात्र कंगनाच्या अभिनयाचं कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहे. अभिनेत्री संमथा अक्कीनेनीनं 'थलायवी' ट्रेलरनंतर कंगनानचं कौतुक करत ट्वीट केलं. आपल्या ट्वीटमध्ये तिनं कंगनाला या पिढीतली सर्वांत टॅलेंटेड आणि धाडसी अभिनेत्री असल्याचं म्हटलं होतं. साउथ आणि बॉलिवूड अभिनेत्री मीरा चोप्रानं सुद्धा कंगनाच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. कंगनानं पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयन केल्याचं तिनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. याशिवाय या चित्रपटात कंगनाच्या अर्थात जयललिता यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री भाग्यश्री यांनीही ट्वीट करून कंगनाच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. कंगनानं नेहमीच बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवला आहे. आलिया भट्ट आणि इतर अनेक स्टार किड्सच्या विरोधात तिनं अनेकदा आवाज उठवला आहे. ज्यामुळे ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडली आहे. जेव्हा सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सर्वच बॉलिवूड कलाकारांनी गप्प राहणं पसंत केलं होतं अशा वेळी कंगनानं मात्र नेपोटीझमच्या विरोधात आवाज उठवला होता. अशात आलियाच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर कौतुक करणारे बॉलिवूडकर 'थलायवी' ट्रेलरनंतर मात्र गप्प आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3d3JkTZ