मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मागच्या काही काळापासून तिच्या दुसऱ्या लग्नामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चेत होती. साहिल सांघीशी घटस्फोट झाल्यानंतर बिझनेसमन वैभव रेखीशी दियानं दुसऱ्यांदा लग्न केलं. त्यांच्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. पण त्यानंतर आता दिया पुन्हा एकादा चर्चेत आली आहे ते तिच्या एक ट्वीटमुळे. पुरुषांबाबत दिया मिर्झानं केलेलं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या या ट्वीटमुळे तिचा चाहते सुद्धा हैराण झाले आहेत. दियानं आपल्या ट्वीटमधून वाढत्या प्रदुषणाकडे सर्वांच लक्ष वेधलं आहे. या ट्वीटसोबत तिनं एक रिसर्च रिपोर्ट सुद्धा शेअर केला आहे. ज्यामुळे दियाचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. दियाच्या ट्वीटमध्ये टॅग करण्यात आलेल्या रिसर्च रिपोर्टनुसार, 'सध्या पर्यावरणात असलेल्या विषारी रसायनांमुळे शुक्राणूंची संख्या आणि टेस्टिकल्सवर परिणाम होत आहे. ज्याचा परिणाम पुरुषांच्या गुप्तांगावरसुद्धा होत आहे.' दिया मिर्झानं हा रिसर्च रिपोर्ट शेअर करताना आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'आता तरी लोक पर्यावरण आणि प्रदुषणाच्या बाबतीत जागरुक होतील.' दियाचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. दिया पर्यावरणाच्या बाबतीत खूप जागरुक आहे आणि याआधीही तिनं अनेक याबाबत अनेक ट्वीट केली आहेत. पण हे ट्वीट तिच्या इतर ट्वीटपेक्षा खूपच वेगळं असल्यानं यावर अनेक कमेंट केल्या गेल्या आहेत. ज्यात युझर्सनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. दिया मिर्झानं फेब्रुवारी २०२१ मध्ये वैभव रेखीशी लग्न केलं. त्यांचं हे लग्न अत्यंत साध्या पद्धतीनं पार पाडलं. अत्यंत खासगी स्वरूपाच्या या लग्न सोहळ्याला दिया आणि वैभव यांचे कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार यांनी हजेरी लावली होती. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल सुद्धा झाले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PwidZt