Full Width(True/False)

अफेअर्स ते भावाला कोंडून ठेवण्यापर्यंत, आमिरवर झाले गंभीर आरोप

मुंबई- आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या असं सांगणाऱ्या रॅन्चोचा आणि परग्रहावरून पृथ्वीवर आलेल्या पीकेचा आज ५६ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता म्हणून तो जनमानसात प्रसिद्ध आहे. पण आमिरचं आतापर्यंतच आयुष्य साधं सरळ नव्हतं. त्याने आयुष्यात त्याने अनेक चढउतार अनुभवले. आताही तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. या प्रवासात त्याचं नाव कित्येक मुलींसोबत जोडलं गेलं. एवढंच नाही तर अगदी भावाला कोंडून ठेवण्यापर्यंतचे गंभीर आरोप आमिरवर केले गेले. खूप कमी लोकांना माहीत असेल की, आमिरने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच रिना दत्ताशी लग्न केलं होतं. सुरुवातीच्या काळात ही गोष्ट दोघांनीही घरातल्यांपासून लपवून ठेवली होती. पण नंतर दोघांच्याही घरातल्यांनी या नात्याचा स्वीकार केला. अनेक वर्षांचा संसार झाल्यावर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. चित्रपट 'कयामत' च्या चित्रीकरणादरम्यान आमिर आणि प्रीती झिंटा यांच्यात जवळीक निर्माण झाल्याचं बोललं जातं. या काळात रिना घर सोडून वेगळीकडे राहायला गेली होती. त्यासोबतच आमिरचं नाव एका परदेशी महिला पत्रकारासोबतही जोडलं गेलं होतं. १९९८ साली 'गुलाम' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पत्रकार जेसिका हाइन्स आणि आमिर लिव्ह इनमध्ये राहत असल्याचंही बोललं गेलं. या काळात जेसिका गरोदर राहिली. ही बातमी पसरल्यानंतर आमिरने जेसिकावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणल्याचं म्हटलं. त्यानंतर जेसिका लंडनला गेली आणि एका मुलाला जन्म दिला. चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्थान' च्या चित्रीकरणादरम्यान आमिर आणि अभिनेत्री फातिमा शेख एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगल्या होत्या. पण या चर्चा खोट्या असल्याचं फातिमाने सांगितलं होतं. याशिवाय आमिरवर त्याच्या भावाला फैजल खानला एक वर्ष घरात कोंडून ठेवण्याचा आरोप करण्यात आला होता. हा आरोप स्वतः त्याच्या भावानेच केला होता. त्याने म्हटलं होतं की, आमिर त्याला चुकीची औषधं देत होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3csAzlW