Full Width(True/False)

२०० चित्रपट सेन्सॉर, तरीही प्रदर्शनाची प्रतीक्षाच; निर्माते अडचणीत

कोल्हापूर संचारबंदीमुळे चित्रपटांच्या चित्रीकरणाबरोबरच प्रदर्शनालाही ब्रेक लागला आहे. वर्षभरात २०० चित्रपट सेन्सॉर झाले असून त्यातील पन्नास चित्रपट प्रदर्शनाला सज्ज असतानाच संचारबंदी मुळे त्याला ब्रेक लागला आहे. यामुळे निर्माते अडचणीत आले आहेत. गेल्यावर्षी जवळजवळ सहा ते सात महिने मराठी चित्रपटांचे चित्रीकरण बंद होते. त्यामुळे वर्षभरात एकही नवीन चित्रपट प्रदर्शित झाला नाही. करोना चा संसर्ग कमी झाल्यानंतर चार ते पाच मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. पण, त्यांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर काही चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असतानाच पुन्हा एकदा संचारबंदी लागू झाली आहे. मुळात परिनिरीक्षण समिती नसल्यामुळे जवळजवळ दोनशे चित्रपट वर्षभर सेन्सॉरच्या प्रतीक्षेत होते. यासंदर्भात 'महाराष्ट्र टाइम्सने' वृत्त दिल्यानंतर राज्य सरकारने तातडीने त्याची दखल घेत समिती नेमली. या समितीने जवळजवळ सर्व चित्रपट सेन्सॉर केल्यानंतर यातील 50 चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज होते. राज्य सरकार या चित्रपटाला वीस, तीस आणि चाळीस लाखापर्यंत अनुदान देते. जोपर्यंत चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत नाही, तोपर्यंत त्याला राज्य सरकार अनुदान देत नाही. अनुदानासाठी चित्रपट प्रदर्शित होणे आवश्यक आहे. पण, 50% प्रेक्षकांच्या अटीमुळे हे चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस निर्मात्यांनी केले नाही. कारण 50% प्रेक्षक असतील तर थिएटरचे भाडे देणे परवडत नाही. प्रतिसाद कमी मिळाला तर त्यातून उत्पन्नही मिळत नाही. यामुळे दीडशेवर चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. निर्मात्यांनी त्यात मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले आहेत. प्रदर्शन अभावी उत्पन्न थांबल्यामुळे बहुसंख्य निर्माते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राज्यात 20 ते 22 नवीन मराठी चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होते. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सात चित्रपटांचा समावेश होता. चित्रीकरणाला बंदी आल्यामुळे हे चित्रीकरण थांबले आहे. विशेष म्हणजे कोल्हापुरात सुभाष घई यांच्या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण होणार होते. पण, तेही आता रद्द झाले आहे. महाराष्ट्रात चित्रीकरणाला बंदी असल्यामुळे काही निर्मात्यांनी आता इतर राज्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात मराठीबरोबरच काही बिग बजेट हिंदी चित्रपटाचे चित्रीकरणही सुरू होते याशिवाय लवकरच काही चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होणार होते पण आता संचार बंदी मुळे त्याला ब्रेक लागला आहे. बिग बजेट चित्रपटांची उलाढाल कित्येक कोटींची असते. आता चित्रीकरण थांबल्याने उलाढालच बंद होणार आहे. याचा मोठा फटका पडद्यामागील कलावंत, तंत्रज्ञ यांना बसणार आहे. कोल्हापुरात सुभाष घई यांच्या हिंदी चित्रपटाचे चाळीस दिवस चित्रीकरण होणार होते. टकाटक चित्रपटाबरोबरच नेटफ्लिक्सवरील सहा मालिकांचे चित्रीकरण नियोजित होते. आता हे सर्व रद्द झाले असून यातील अनेकांनी गोवा, हैद्राबाद, भोपाळ, जयपूर गाठले आहे. यामुळे शंभर ते दोनशे कोटीपेक्षा अधिक रक्कमेची उलाढाल थांबली आहे. दीडशेवर मराठी चित्रपटांचे प्रदर्शन लांबले आहे याचा दुहेरी फटका निर्मा त्याबरोबरच राज्य सरकारलाही बसणार आहे कर रूपाने मिळणारा करमणूक कर रूपाने मिळणारा महसूल बुडणार आहे शिवाय निर्मात्यांची उत्पन्नही थांबल्यामुळे ते मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत यामुळे निर्मात्यांनी आता अनुदान राज्य सरकारकडे अनुदानाची मागणी सुरू केली आहे. चित्रीकरण थांबल्यामुळे पडद्यामागील कलावंत व तंत्रज्ञ यांचे उत्पन्न बंद झाले आहे त्यामुळे त्यांच्यावरही उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dA7uqu