Full Width(True/False)

'वर्षभरात एकाही रुपयाची कमाई नाही, करोनामुळे कफ्फल्लक झालोय'

मुंबई : देशासह राज्यात करोनाचा उद्रेक झाल्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणे पुन्हा लॉकडाउन लागू झाला. त्याचा सर्वाधिक फटका मनोरंजन विश्वावर पडला आहे. दिवसाप्रमाणे कमाई करणारे पडद्यामागच्या कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली तशीच वेळ काही कलाकारांवरही आली आहे. करोनामुळे गेल्या दीड वर्षांत एकाही रुपयाची कमाई नसल्याने पूर्णपणे कफल्लक झालो असून लोकांकडून पैसे उधार घ्यावे लागत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया अभिनेता यांनी व्यक्त केली आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपली ही कैफियत मांडली आहे. दीड वर्षापासून काम नाही पैसाही नाही अयुब खान म्हणाले, ' गेल्या दीड वर्षांपासून मला काहीच काम मिळालेले नाही. त्यामुळे माझ्या हातात पैसा नाही. ही परिस्थिती जर बदलली नाही तर लोकांकडून मला पैसे मागावे लागतील.' काळामध्ये फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीचा पूर्ण व्यवसाय ठप्प झाल्याने सगळ्यांनाच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अयुब खान यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया येथील सर्वांनाच लागू पडणारी आहे. ...तर मला हात पसरावे लागतील अयुब खान आता ५२ वर्षांचे आहेत. त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले, ' मान्य आहे की करोनाचा फैलाव इतका आहे की त्यामुळे लॉकडाउन लावणे अपरिहार्य झाले आहे. परंतु जे काही साठवून ठेवलेले पैसे होते ते देखील आता संपू लागले आहे. जे आहे त्यातच आता दिवस काढत आहोत. परंतु अशीच परिस्थिती यापुढेही राहिली तर मला लोकांकडे आर्थिक मदतीसाठी हात पसरण्याची वेळ येणार आहे. अशी वेळ येण्यापासून देवाने मला वाचवावे, इतकीच माझी त्याच्याकडे प्रार्थना आहे... दुसरे मी त्याच्याकडे काहीच मागत नाही.' अजूनही बदलण्याची आशा आहे अयुब खान यांनी १९९२ मध्ये 'माशूक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परंतु त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती छोट्या पडद्यामुळेच. 'उतरन', 'शक्ति : अस्तित्व के एहसास की' आणि ' रंजू की बेटियां' यांसारख्या मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयानाची छाप उमटवली आहे. सध्याची परिस्थिती पाहून तो निराश झालेला नाही. ते पुढे म्हणाले, ' मला आशा आहे की भविष्यात ही परिस्थिती नक्कीच बदलेल आणि मी पुन्हा कामाला सुरुवात करीन. परंतु जर असे नाही झाले तर नाईलाजाने मला लोकांकडे पैशांसाठी हात पसरवावे लागणार आहेत. देव न करो ही परिस्थिती येवो... याबाबत मी अजूनही आशावादी आहे...' कोविडमुळे काका आणि मित्र गमावले या मुलाखतीमध्ये अयुब खान पुढे म्हणाले की, ' या करोनामध्ये माझे अनेक जवळची माणसं मी गमवाली आहेत. माझे दोन काका आणि काही मित्रांना गमावले आहेत. त्यामुळे जवळच्यांना गमवाण्याचे दुःख मला माहिती आहे.' तेव्हा सगळ्यांना फटका बसेल अयुब खान पुढे म्हणाला की, ' आज सुशिक्षित लोक ही करोना वगैरे काही नाही असे म्हणतात. तेव्हा मला खूप आश्चर्य वाटते. मला कळत नाही लोकांची संवेदनशीलता कुठे गेली आहे. सुदैवाने तुम्हा अथवा तुमच्या जवळच्यांना काही झाले नाही म्हणून तो आजार नाही असे ते कसे म्हणू शकता. जेव्हा तुम्हाला याची लागण होईल, तेव्हा तुमच्यासह सगळ्यांना त्याचा फटका बसेल.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3v4cl9d