मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सध्या चित्रपटांपासून दूर आहे. तिने नुकतच एका गोड मुलीला जन्म दिला आहे. सध्या अनुष्का तिचा संपूर्ण वेळ कुटुंबाला देत आहे. ती तिच्या नम्रपणामुळे चाहत्यांची लाडकी आहे. अनुष्काने 'बॅण्ड बाजा बारात' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने तिच्या ओठांवर शस्त्रक्रिया करून चाहत्यांना धक्काच दिला होता. २०१४ मध्ये जेव्हा अनुष्का एका कार्यक्रमात गेली होती तेव्हा तिचा चेहरा खूप वेगळा दिसत होता. तिच्या ओठांबाबतीत प्रेक्षकांमध्ये भरपूर चर्चा रंगली होती. चाहत्यांनी अनेक मिम्स बनवून तिला ट्रोल केलं होतं. त्यानंतर तिने २०१६ मध्ये शस्त्रक्रिया केल्याचं मान्य केलं होतं. अनुष्काने २०१४ मध्ये 'कॉफी विथ करण' मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा अनुष्काचे ओठ पाहून प्रेक्षक हैराण झाले होते. अनेकांनी तिच्यावर मिम्स बनवून तिच्या ओठांची तुलना बदकाच्या चोचीबरोबर केली होती. त्यावेळी पत्रकार विराट कोहलीला देखील यासंबंधी प्रश्न विचारू लागले होते. यानंतर २०१६ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत तिने ही गोष्ट मान्य केली. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का शर्मा म्हणाली होती की, 'मी काहीही लपवलं नाही. जेव्हा मी माझ्या ओठांच्या शस्त्रक्रियेबद्दल लोकांना सांगितलं तेव्हा त्यांनी माझं कौतुक केलं. 'बॉम्बे वेलवेट' चित्रपटातील माझ्या भूमिकेसाठी हे गरजेचं होतं त्यामुळे मी हे केलं. मी खोटं नाही बोलली. हा निर्णय मला घ्यावा लागला आणि मी तो घेतला. मला वाटतं प्रेक्षकांनाही हे कळावं की मीसुद्धा एक माणूस आहे. जी कधीही परिपूर्ण असू शकत नाही.' या कार्यक्रमात तिने ही गोष्ट मान्य केली असली तरीही २०१४ मध्ये अनुष्काने ओठांवर तात्पुरती शस्त्रक्रिया केल्याचं आणि मेकअप टेकनिक वापरल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आलेल्या एका रिपोर्टमध्ये, अनुष्काला एका लिपस्टिक ब्रॅण्ड कंपनीने जाहिरात करण्याची ऑफर दिली होती आणि त्यासाठी तिने ही शस्त्रक्रिया केल्याचं म्हटलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fRsDOt