मुंबई- बॉलिवूडमध्ये आपण नेहमीच जोड्या बनताना आणि बिघडताना पाहतो. काही अभिनेत्रींचे संसार टिकतात तर काही घटस्फोटाचा मार्ग निवडतात. तर काही अभिनेत्री दुसऱ्या लग्नाचा पर्याय निवडतात. परंतु, जर दुसरंही लग्न टिकू शकलं नाही तर? बॉलिवूड अभिनेता आणि यांची आई अभिनेत्री यांच्यासोबतही काहीसं असंच झालंं आहे. नीलिमा यांनी दोन घटस्फोटाचं दुःख सहन करत तिसरं लग्न केलं. त्यांनी पंकज कपूर आणि राजेश खट्टर यांच्यासोबत लग्न केलं होतं. परंतु, त्यांची दोन्ही लग्न फार काळ टिकू शकली नाहीत. आता नीलिमा यांनी लग्न तुटण्याचं दुःख व्यक्त करत या घटनांवरच्या त्यांच्या मुलांच्या प्रतिक्रिया सांगितल्या आहेत. एका मुलाखतीत नीलिमा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. दोन्ही लग्न तुटल्यावर त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यांना अनेक मानसिक आजारांना सामोरं जावं लागलं होतं. त्या काळात त्यांनी आयुष्यातील भीती, दुःख, रिजेक्शन सहन केलं होतं. परंतु, या काळातही नीलिमा यांची मुलं त्यांच्यासोबत होती. लग्न मोडल्यावर त्यांच्या मुलांच्या काय प्रतिक्रिया होत्या हे सांगताना त्या म्हणाल्या की, 'शाहिद आणि ईशान कायम माझ्यासोबत राहिले. त्यांनी मला पाठिंबा दिला. माझी काळजी घेतली. मला समजून घेतलं.' नीलिमा यांचं पहिलं लग्न पंकज कपूर यांच्यासोबत झालं. नीलिमा आणि पंकज यांचा शाहिद मुलगा आहे. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांमध्ये खटके उडू लागले आणि कालांतराने दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नीलिमा यांनी अभिनेते राजेश खट्टर यांच्याशी लग्न केलं. परंतू ईशानच्या जन्मानंतर त्यांच्यातही वाद होऊ लागल्याने दुसरं लग्नदेखील मोडलं. पंकज यांच्यासोबतच्या मोडलेल्या संसारामुळे नीलिमा खूप दुःखी झाल्या होत्या. हे नातं तुटल्यावर त्यातून सावरायला त्यांना दीड वर्ष लागलं होतं. परंतु, राजेश यांच्यासोबतच्या नात्यावर खुलासा करत त्या म्हणाल्या की, त्या स्वतः ते नातं वाचवू शकल्या असत्या. परंतु, त्यांनी तसा प्रयत्न केला नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mMB8M1