Full Width(True/False)

होळीच्या दिवशी सोसायटीत गोंगाट, केतकी चितळे भडकली; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: 'तुझं माझं ब्रेक अप' या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री हिनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. केतकीला लहानपणापासून एपिलेप्सी म्हणजेच अपस्मार हा आजार आहे. या आजाराबद्दल केतकी जनजागृती करण्याचाही प्रयत्न करत असते. या आजारामुळं समाजात कशा प्रकारचे अनुभव आले, ते अनेकदा केतकीनं शेअर केले आहेत. तिला नुकताच आलेला अनुभव केतकीनं व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितला आहे. केतकीनं तिच्या सोसायटीत आलेला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केलाय. होळीच्या दिवशी सोसायटीमध्ये मुलांचा गोंगाट सुरू होता, त्यामुळं केतकीची तब्येत बिघडली. तिनं गोंगाट कमी करण्याची विनंती केली, तरीही मुलांचा गोंगाट सुरू होता, असं केतकीनं तिच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. याच संदर्भात केतकी एका महिलेशी बोलताना दिसत आहे. परंतु काही वेळानं दोघीही एकमेकांशी भांडणताना दिसतात. सोसायटीत होणाऱ्या त्रासासंदर्भात केतकीनं पोलिसांना देखील कळवलं होतं. त्यांनीही सहकार्य केलं, असंही केतकीनं तिच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. काय आहे नेमकं प्रकरण? केतकी ज्या सोसायटीत राहते त्या सोसायटीत होळीच्या दिवळी लहाण मुलंढोल ताशे वाजत होते. केतकीला या आवाजाचा त्रास होऊ लागल्यानं तिनं आवाज बंद करण्यास सांगितलं पण आवाज कमी न झाल्यानं केतकी सोसायटीतील एका महिलेशी वाद घालताना दिसत आहे. भांडणादरम्यान समोरच्या महिलेमं 'जाऊ दे ,मरु दे' असे शब्द वापरल्यानं केतकीचा पारा आणखी चढला आणि तुमच्या सारख्या लोकं स्वार्थी असतात, असं म्हणत मानसिक आजार असलेल्यांचा विचार होत नसल्याचं मतही तिनं मांडलं. एपिलेप्सी म्हणजे काय?फिट येणं, आकडी, मिरगी आदी नावांनी अपस्मार हा आजार ओळखला जातो. या आजारावर उपचार शक्य आहेत. औषधांनी तो बरा न झाल्यास शस्त्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. या आजाराविषयी नीट माहिती घेणं, गैरसमज दूर करणं यातून उपचारांविषयीची जागरुकता वाढेल आणि त्याचा उपयोग रुग्णांना होईल. हा आजार जगभर आढळतो. लोकसंख्येच्या जवळपास एक टक्का, एवढे याचे प्रमाण आहे. या आजारामुळं खेळणं, पोहणं, वाहन चालवणं, रोजगार, शिक्षण, लग्न, सामाजिक प्रतिष्ठा अशा बऱ्याच गोष्टींपासून रुग्ण वंचित राहातो. लहान मुलांमध्ये हा प्रश्न अधिक बिकट आहे. योग्य त्या वयात आणि वेळीच अचूक निदान होऊन उपाचार न झाल्यास मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही. मतिमंदत्व येतं. याच मुलांवर योग्य वेळी शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार झाले तर ती पूर्णतः सामान्य आयुष्य जगू शकतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sK3b19