मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सूत्रसंचालक आणि व्हिडीओ जॉकी असलेली सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनुषा मागील काही वर्षांपासून अभिनेता याच्यासोबत रिलेशनमध्ये होती. परंतु, २०२० च्या जानेवारीमध्ये त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या. त्यावेळेस दोघांनीही या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं होतं. परंतु, आता अनुषाने पहिल्यांदाच त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. तिने सोशल मीडियावर तिची फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे. अनुषाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसाठी प्रश्न उत्तरांचा सेशन ठेवलं होतं. त्यात तिने करणने तिला फसवल्याचं म्हटलं आहे. या सेशन दरम्यान तिच्या चाहत्याने तिला प्रश्न विचारला, 'ब्रेकअपनंतर तुम्ही स्वतःला कसं सांभाळलं? त्यावर उत्तर देताना तिने म्हटलं, 'त्या वेळेस मी खूप निराश झाले होते. पण तेव्हाही मी सत्य परिस्थितीचा स्वीकार केला. तेव्हा मी शिकले की स्वतःवर प्रेम कसं करायचं असतं.' अजून एका चाहत्याने तिला करणसोबतच्या नात्याबद्दल विचारलं. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, 'मी पण एक माणूस आहे. तेव्हा मी समोरच्याला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःला विसरून गेली. मला फसवलं गेलं. माझ्याशी खोटं बोललं गेलं. मला वाटलेलं की समोरचा एकदा तरी माझ्याकडे येऊन माझी माफी मागेल. पण तसं काहीही झालं नाही. पण या वेळेत मी स्वतःला सावरायला शिकले. आता मला त्या गोष्टी विसरून पुढे जायला हवं.' २०२० साली अनुषा आणि करणच्या नात्यामध्ये आलेल्या दुराव्यानंतर अनुषाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. तिने लिहिलं होतं, 'हो, जेव्हा मी प्रेम करते तेव्हा भरपूर करते आणि मी त्या नात्याला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करते.' अनुषा आणि करणच्या ब्रेकअपने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3muH8sW