Full Width(True/False)

करोनामुळे मालदीवमध्ये अडकला अभिनेता, पत्नी आली भारतात

मुंबई- करोनामुळे कुणावर कोणतं संकट येईल काही सांगता येत नाही. करोनाचा प्रसार फक्त भारतात नाही तर इतरही देशात झाला आहे. त्यामुळे बाहेरच्या देशात गेल्यावर आपण करोनापासून वाचू शकतो असा विचार तुम्ही करत असाल तर ते साफ चुकीचं आहे. छोट्या पडद्यावरील '' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीसोबत मालदीवला सुट्ट्या घालवणायसाठी गेला होता. परंतु, तिथे त्याला करोनाची लागण झाल्याने सगळंच बिघडलं आणि शेवटी त्याच्या पत्नीला एकटीला भारतात परतावं लागलं. नमिश त्याच्या पत्नीसोबत काही दिवसांतच पुन्हा भारतात परतणार होता. परंतु, १२ एप्रिल रोजी त्यांची करोना चाचणी करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आल्याने त्याला तिथल्या एका रिसॉर्टमध्ये आयसोलेट करण्यात आलं आहे. त्याच्या पत्नीची चाचणी निगेटिव्ह आल्याने तिला भारतात परत पाठवण्यात आलं आहे. या संपूर्ण गोष्टीची माहिती स्वतः नमिशने इन्स्टाग्राम अकाउंटवर दिली. त्याने लिहिलं, 'मला मालदीवमध्ये करोनची लागण झाली आहे. माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी एका रिसॉर्टमध्ये क्वारंटाइन आहे. सगळ्या सुरक्षेचं पालन केल्यानंतरही हे झालं. त्यामुळे अफवांपासून दूर राहा. हा विषाणू खरंच आहे आणि सगळीकडे पसरतो आहे. कृपया तुमचा मास्क घाला. हातांना सॅनिटाइझ करत राहा. बाहेर निघू नका. स्वतःची काळजी घ्या. भारतापेक्षा जास्त चांगला देश असूच शकत नाही.' नमिश आपल्या पत्नीसोबत चार दिवसांनी भारतात परतणार होता. परंतु, घडल्या प्रकारामुळे त्याच्या पत्नीला एकटीलाच भारतात परत यावं लागलं. आणखी एक पोस्ट करत त्याने त्याच्या पत्नीच्या अवस्थेबद्दल सांगितलं. त्याने सांगितल्यानुसार, त्याची पत्नी त्याला सोडून भारतात परत यायला तयार नव्हती. नमिशने तिची खूप समजूत घातली. त्यानंतर ती तयार झाली. जेव्हा ती त्याला सोडून भारतात परत येत होती. तेव्हाही तिच्या डोळ्यात अश्रू होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ei14eI