Full Width(True/False)

Photo: लग्नाच्या वाढदिवसाला एकत्र नव्हते ऐश्वर्या-अभिषेक

मुंबई : ऐश्वर्या राय आणि यांच्या लग्नाला नुकतीच १४ वर्षे पूर्ण झाली. २० एप्रिल २००७ मध्ये लग्न झाले होते. एकेकाळची मिस वर्ल्ड म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐश्वर्याने जेव्हा अभिषेक बच्चनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. बघता बघता या दोघांच्या लग्नाला अलिकडेच १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसा निमित्ताने चाहत्यांनी त्यांना भरभरू शुभेच्छा दिल्या. अभिषेक बच्चन त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी लखनऊला गेला आहे. तिथून त्याला मुंबईला येणे शक्य नसल्याने या जोडीने त्यांच्या लग्नाचा वाढदिवस ऑनलाइनच साजरा केला. या ऑनलाइन सेलिब्रेशनचा एक फोटो ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत दिसत आहे तर अभिषेक लाल रंगाच्या टीशर्मध्ये दिसत आहे. या तिघांचेही चेहरे आनंदी दिसत आहेत. हा फोटो शेअर करत ऐश्वर्याने खूप सारे इमोजीही टाकले आहेत. या फोटोवर अभिषेक आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांनी भरभरून कमेन्ट केल्या आहेत. लग्न झाल्यानंतर ऐश्वर्या सिनेमांमध्ये फारशी दिसली नाही. ऐश्वर्या सध्या आराध्यासोबतच जास्त वेळ घालवत आहे. मात्र तिच्या ग्लॅमरस अंदाजातील फोटोंमुळे ऐश्वर्या सातत्याने चर्चेत असते. लग्नानंतर ऐश्वर्या- अभिषेक अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत एकत्रच राहतात. त्याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. आपण एकत्र कुटुंबात का राहतो, याबाबतचे स्पष्टीकरण ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांनी एका मुलाखतीमध्ये दिले होते. या दोघांची मुलाखत ऑप्रा विनफ्रेने घेतली होती. तुम्ही एकत्र कसे राहता असा प्रश्न ऑप्रा यांनी विचारला असता 'आमच्यासाठी हे नैसर्गिक आणि सामान्य आहे’, असे उत्तर ऐश्वर्याने दिले होते. त्यावर अभिषेक म्हणाला, ‘माझे वडील त्यांच्या आई-वडिलांसोबतच राहात होते. मी माझ्या आई-वडिलांसोबत राहतो.’ ‘एकत्र म्हणजे तुम्ही सगळे जेवण एकत्र करता की तुम्ही एका कोपऱ्यात असता आणि आई-वडील दुसऱ्या?, असा प्रश्न ऑप्राने यावर विचारला. त्यावेळी अभिषेक म्हणाला, 'आम्ही एकाच शहरात असलो तर दिवसातील एक वेळचे जेवण तरी सर्वांनी एकत्र घेतले पाहिजे, असा माझ्या आईचा नियम आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vbIBaw