Full Width(True/False)

गौरीआणि आर्यनला पाहून युझर्स म्हणाले- यांना देशातूनच हकलून द्या

मुंबई- भारतात सगळीकडेच करोनाने थैमान घातलं आहे. परिस्थिती दिवसेंदिवस आणखी गंभीर होत आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात यापूर्वी १५ दिवसांचं लॉकडाउन लावण्यात आलं होतं. परंतु, बिघडणारी परिस्थिती पाहता महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन आणखी कडक करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, लॉकडाउनमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार बाहेरगावी फिरायला गेल्यामुळे चाहते त्यांच्यावर रागावले होते. जान्हवी कपूर, सारा अली खान, दिशा पाटनी यांसारखे कलाकार देशाबाहेर जाऊन मजा करण्याविरोधात आधीच वातावरण तापलेलं असताना आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी आणि मुलगा आर्यनदेखील चाहत्यांकडून ट्रोल झाले आहेत. महाराष्ट्रात कडक लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वी गौरी आणि आर्यन यांना मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. ते दोघेही न्यूयॉर्कला जात असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. त्यांचा विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईमध्ये इतकी गंभीर परिस्थिती असताना बॉलिवूड कलाकार सुट्ट्या घालवण्यासाठी फिरायला जात असल्याचं पाहून नेटकरी आणखीनच चिडले. त्यांनी गौरी आणि आर्यनला या कारणावरून ट्रोल केलं आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. एका युझरने लिहिलं, 'सेलिब्रिटी तर फक्त नावाचे भारतीय आहेत. जेव्हा देशावर काही संकट येतं सगळ्यात आधी देशातून पळून जातात.' आणखी एका युझरने लिहिलं, 'हा, भारतात आता परिस्थिती खराब आहे तर निघून जा परदेशात. पैसे कमावण्यासाठी इकडे या आणि जेव्हा देशाला गरज आहे तेव्हा निघून जा.' एक युझर म्हणाला, 'हे सगळे निर्लज्ज आहेत.' तर दुसऱ्या युझरने लिहिलं, 'बघा यांना फक्त फिरायचं आहे, देशावर एवढं मोठं संकट आहे आणि यांना पळून जायचंय. कोणी मालदीवला जातंय तर कोणी न्यूयॉर्कला.' एकाने लिहिलं, 'पळा, सगळेजण जा.. प्रेक्षक लक्षात ठेवतील, एक ना एक दिवस परत याल ना.' अनेकांनी तर त्यांना देशातून काढून टाकण्यासाठी देखील सांगितलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sDvSM9