Full Width(True/False)

Video- कंगनानं करणकडे केलं दुर्लक्ष; बिचाऱ्याचा उतरला चेहरा

मुंबई : ज्यांच्यामधून विस्तवही जात नाही असे बॉलिवूडमधील जोडी म्हणजे आणि . कंगना सातत्यानेकरणवर घराणेशाहीचा आरोप करत त्यावर टीका करत आली आहे. अगदी अलिकडे जेव्हा कार्तिक आर्यनला धर्मा प्रॉडक्शनमधून बॅन करत असल्याचे जाहीर केले तेव्हादेखील तिने कार्तिकची बाजू घेत करणला चार शब्द सुनावले होते. अर्थात करण आणि कंगनामधील हा वाद आताचा नाही तर तो पूर्वीपासून चालत आला आहे. अगदी जेव्हा कंगनाने या सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला तेव्हापासूनच या वादाला सुरुवात झाली होती. कंगनाने पहिल्यापासूनच करणकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण स्वीकारले होते जे आजही कायम आहे. कंगनाने २००६ मध्ये रिलीज झालेल्या 'गँगस्टर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूपच यशस्वी ठरला होता. या सिनेमातील गाणीही लोकप्रिय झाली होती. 'गँगस्टर' साठी कंगनाला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीसाठी पारितोषिकही मिळाले होते. याच पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात असे काही घडले की त्यामुळे करण आणि कंगनामधील दरी अधिकच रुंदावली. तो पारितोषिक वितरण समारंभ करण होस्ट होता. त्याने मोठ्या प्रेमाने कंगनाला हा पुरस्कार घेण्यासाठी मंचावर बोलावले. या कार्यक्रमात कंगना खूपच नर्व्हस होती. इतकी की ती या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांशीही नीट बोलू शकली नाही. इतकेच नाही तर ती करणशीही काही बोलली नाही तिने पारितोषिक घेतले आणि ती निघून गेली. हे सर्व करणला आवडले नाही. कंगनाने त्याच्याकडे केलेले दुर्लक्षामुळे त्याचा चेहरा उतरला होता. अर्थात या घटनेनंतर कंगनाने करणच्या 'उंगली' सिनेमात काम केले होते. परंतु यामध्ये कंगना मुख्य भूमिकेत नव्हती. त्यानंतर अनेकदा कंगनाने करणचे कौतुकही केले होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून हे कौतुक टीकेमध्ये रुपांतरीत झाले आहे. दरम्यान, कंगनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिचा 'थलायवी' सिनेमा २३ एप्रिल रोजी रिलीज होणार होता. परंतु करोनाच्या वाढत्या फैलावामुळे तो पुढे ढकलला आहे. हा सिनेमा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारीत आहे. त्याचप्रमाणे 'तेजस' आणि 'धाकड' या सिनेमातही ती काम करत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RSt2q0