Full Width(True/False)

'...अशा घटनांमुळे प्रेम आणि लग्नावरचा विश्वासच उडालाय'

मुंबई : टीव्ही अभिनेता आणि त्याची बायको यांच्यातील वादावर अनेकजण आपापले मत व्यक्त करत आहेत. काहीजण निशाला पाठिंबा देत आहेत तर काहींचा करणला पाठिंबा आहे. आता या वादावर ड्रामा क्विन राखी सावंतनेही तिची प्रतिक्रिया दिली आहे. राखीने सांगितले की, ती या दोघांनाही ओळखते. या दोघांच्या नात्यामध्ये जो तणाव निर्माण झाला आहे, तो पाहून लग्न आणि प्रेम यावर तिचा विश्वासच राहिलेला नाही. निशा-करण वादावर काय म्हणाली राखी कोणताही वाद, घटना असो त्यावर राखी सावंत आपली प्रतिक्रिया व्यक्त करतेच करते. मग ते राजकारण असो किंवा कोणतीही सामाजिक घटना, त्यावर राखी काय बोलते याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असते. अभिनेता करण मेहरा आणि निशा रावल यांच्यात सुरू असलेल्या वादावरही राखी सावंतने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ती म्हणाली, 'काल रात्री जेव्हा निशाचे जखमी अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले ते पाहून मी खूप रडले. तिला खूप लागलेले दिसत होते. जर करण आणि निशाचे लग्न तुटू शकत असेल तर कुणाचीही जोडी तुटू शकते. हे दोघेजण एकमेकांवर खूप प्रेम करायचे. त्यांनी तर एकमेकांबरोबर जगण्याच्या आणि मरणाच्या शपथा घेतल्या होत्या. मी या दोघांची मैत्रीण आहे. त्यांच्यासोबत मी अमेरिकाला फिरायला गेले होते. त्यामुळे मी त्यांना खूप चांगले ओळखते. त्यामुळेच त्यांच्याबद्दल या बातम्या जेव्हा आल्या तेव्हा मला धक्काच बसला.' राखी पुढे म्हणाली, 'खरे तर निशा ही खरे बोलणारी आणि मृदूभाषी व्यक्ती आहे. तसाच करणदेखील खूप मृदू स्वभावाचा आहे. परंतु या दोघांमधले नाते संपुष्टात येत असल्याचे पाहून मला खूप दुःख होत आहे. इतकेच नाही तर हे सगळे पाहून माझा प्रेम आणि लग्नावरचा विश्वास उठला आहे.' राखी सावंत कायमच तिच्या वैवाहिक जीवनावरून बरीच चर्चेत आहे. बिग बॉस १४ मध्ये राखीने तिच्या आयुष्याची कथा सर्वांना ऐकवली होती. तिने सांगितले होते की तिने ज्या व्यक्तीशी लग्न केले होते तो पहिल्यापासूनच विवाहित आहे आणि त्याला मुलेदेखील आहेत. त्याने आपल्याला धोका दिला असल्याचे राखीने सांगितले. राखीने असेही सांगितले आहे की ती लग्नानंतर अजूनही तिच्या नवऱ्याला भेटलेली नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vZ2XVa