Full Width(True/False)

कोणासोबत राहण्यापेक्षाही कठीण निर्णय असतो त्यांच्यापासून दूर जाण्याचा

मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि तिचा नवरा यांच्यात काही कारणांमुळे दुरावा आला आहे. त्यामुळे किर्ती एप्रिल महिन्यापासून वेगळी रहात आहेत. याबाबत किर्तीने सोशल मीडियावर पोस्ट करत ते दोघे एकमेकांच्या संमतीने वेगळे होत असल्याचा निर्णय जाहीर केला होता. हे सांगत असताना किर्तीने लिहिले की, 'लग्नबंधनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेणे कुणासाठी सोपे नसते. परंतु असे काही घडले त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. हा निर्णय घेताना खूप धैर्य गोळा करावे लागले.' काय म्हणाली किर्ती... किर्ती कुल्हारी आणि साहिल सहगल परस्पर संमतीने वेगळे होत आहेत. त्यांच्या विभक्त होण्याबद्दल किर्तीने लिहिले की, 'कुणासोबत रहायचे हा निर्णय घेण्यापेक्षाही हा निर्णय घेणे खूपच कठीण होता. सगळेजण एकमेकांशी जोडलेले असतात. तुमचे कुटुंब असते, त्यांचा आनंद, त्यांच्या प्रेमाच्या कल्पना, आनंद व्यक्त करण्याच्या पद्धती असतात. तर दुसरीकडे तुम्ही अशा गोष्टी तोडत असतात ज्या तुम्ही एकत्रितपणे जोडलेल्या असतात. कुटुंब तुटली जातात. हा निर्णय घेणे खरोखरच खूप कठीण असते. परंतु मी विचार केला की एकत्र राहण्याचा निर्णय हा माझा होता तर एकत्र न राहण्याचा निर्णयही मलाच घ्यायचा आहे. असे सर्व निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लागतो आणि काही गोष्टींना तुमच्या आयुष्यातून जाऊ देणेच योग्य असते.' किर्तीने पुढे लिहिले आहे की, ' मी जो निर्णय घेतला आहे, त्याचे परिणाम भोगण्यासाठी देखील मी तयार आहे. हा निर्णय तुमच्या आयुष्यावर परिणाम करणारा असतो आणि आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर तुम्हांला निराशेचा अनुभव देणारा असतो.परंतु दिवस संपताना तुम्हाला जाणीव होऊ लागते की तुम्ही जे काही केले आहे ते योग्यच आहे आणि जे तुमच्यासाठी करणे आवश्यक असते.' एक एप्रिल रोजी किर्ती कुल्हारीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने लिहिले होते, 'ही नोट लोकांना माहिती देण्यासाठी पोस्ट करत आहे. मी आणि माझा पती साहिलने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कागदोपत्री नाही, पण प्रत्यक्ष आयुष्यात घेतला आहे. हा अतिशय कठीण निर्णय आहे. तुम्ही कुणासोबत रहायचे यापेक्षादेखील एखाद्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेणे अतिशय कठीण असते. हे असे होते कारण तुम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेता तेव्हा जे तुमच्यावर खरेखुरे प्रेम करतात, ज्यांना तुमची चिंता आहे असे प्रत्येकजण त्याचा आनंद साजरा करतात.' किर्तीने पुढे लिहिले, 'आता यापुढे एखाद्यासोबत आपण राहणार नाही, हा निर्णय घेणे खूप कठीण असते. या निर्णयामुळे तुमच्यासोबत अनेकांना दुःख होते, अनेकजण दुखावले जातात. हे अजिबात सोपे नसते. खरोखरच हे सोपे नाही. परंतु जे वास्तव आहे ते आहे. हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना खरोखरच आमची पर्वा आहे. मी आता ठीक आहे. आता यापुढे यावर कुणीही काही बोलणार नाही आणि मीदेखील त्यावर काही बोलणार नाही. मी आयुष्यात पुढे जात राहणार आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gNOWmW