Full Width(True/False)

तुषार कपूरने घेतला कधीही लग्न न करण्याचा निर्णय, म्हणाला..

मुंबई- लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्वाची घटना असते. लग्न करून आयुष्यभर आपल्याला हव्या असणाऱ्या जोडीदारासोबत राहणं कित्येकांचं स्वप्न असतं. परंतु, कित्येक बॉलिवूड कलाकारांनी या विचारांना फाटा देत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूड अभिनेता यानेदेखील त्यांच्याच पावलावर पाउल ठेवत कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तुषारने त्याचे लग्नाबद्दलचे विचार बोलून दाखवले आहेत. तुषार एका मुलाचा बाप आहे आणि पालक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. मुलाखतीत तुषारला त्याच्या भविष्यातील योजनेबद्दल विचारणा करण्यात आली. लग्न कधी करत आहेस, असं विचारल्यावर तुषार म्हणाला, 'नाही, माझा लग्नाचा कोणताही विचार नाही. कारण जर माझा लग्नाचा विचार असता तर मी एकट्याने मुलाचा सांभाळ करायचं का ठरवलं असतं. मी प्रत्येक दिवशी माझ्या मुलासोबत काही ना काही नवीन करत असतो. त्याच्याशिवाय इतर कोणताही पर्याय मी निवडू शकत नाही. मी स्वतःला इतर कोणासोबत वाटून घेऊ शकत नाही. आताही नाही आणि भविष्यातही नाही. शेवटी सगळं ठीक होतं आणि आताही सगळं ठीक सुरू आहे.' मागील वर्षी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तुषारने म्हटलं होतं की, प्रकाश झा यांनी त्याला सरोगेसीच्या माध्यमातून बाप बनण्याचा सल्ला दिला होता. तुषारने म्हटलं, 'एक आई मुलाचं डायपर बदलते, मुलांना जेवायला देते. लोकांना वाटतं हेच पालकत्व आहे. पण तसं नाहीये. आई- वडील बनणं खूप अवघड आहे. पालक बनणं म्हणजे खूप साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळणं आहे. याची सुरुवात प्रेमाने होते, जे कोणत्याही अटीशिवाय केलं जातं. त्यांना मोठं करणं आणि त्यांना पाठिंबा देत राहणं. तुम्ही बाप आहात म्हणून तुमच्या भावना बदलत नाहीत. मी माझ्या मुलासोबत आनंदी आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fGiraV