Full Width(True/False)

अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे निधन, झोपेतच घेतला अखेरचा श्वास

मुंबई : दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या मालिकेने टीव्ही जगतामध्ये इतिहास रचला. रामायणातील प्रत्येक कलाकाराने त्यांना दिलेल्या भूमिकेचे अक्षरशः सोने केले होते. आजही हे कलाकार आणि साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. रामायण मालिकेमध्ये दशरथ राजाचे महामंत्री सुमंत यांची भूमिका साकारणारे कलाकार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. चंद्रशेखर यांचा मुलगा प्रोफेसर अशोक चंद्रशेखर यांनी या माहितीची पुष्टी केली. गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रशेखर आजारी असल्याचेही त्यांनी सांगितले. चंद्रशेखर यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. चंद्रशेखर वैद्य यांचा जन्म १९२३ हैदराबाद येथे झाला. अभिनयाची आवड असल्याने शालेय वयातच चंद्रशेखर यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. त्यामुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले. चंद्रशेखर यांचे अभिनय क्षेत्रातील करिअर आणि व्यक्तिगत आयुष्य अतिशय खडतर असे होते. त्यांच्याकडे काम नसल्याने त्यांना सुरक्षा रक्षकाचे कामही करावे लागले होते. चंद्रशेखर यांनी भारत छोडे आंदोलनातही सहभाग घेतला होता. रामायणातील आर्य सुमंतची भूमिका अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या चंद्रशेखर यांनी सिंटाची स्थापना केली होती. चंद्रशेखर यांनी त्यांच्या करिअरमध्ये ११० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले. त्यात १९६४ मध्ये प्रदर्शित झालेला 'चा चा चा' आणि १९६४ मध्ये आलेला 'स्ट्रीट सिंगर' या सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले. रामानंद सागर यांची निर्मिती असलेल्या 'रामायण' मालिकेमध्ये चंद्रशेखर यांनी महामंत्री सुमंत ही भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्यांना खूप लोकप्रियता मिळाली होती. चंद्रशेखर हे रामानंद सागर यांचे खूप जवळचे मित्र होते. रामायण मालिकेतील ते सर्वात ज्येष्ठ कलाकार होते. रामायण मालिकेतील या कलाकारांचेही निधन चंद्रशेखर वैद्य यांच्याव्यतिरीक्त या मालिकेतील काही कलाकरांचेही निधन झाले आहे. त्यामध्ये सुग्रीवाची भूमिका साकारणारे श्याम सुंदर कलानी यांचे गेल्यावर्षी निधन झाले. अनेक वर्षांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते. याच मालिकेत मेघनादची भूमिका साकारणारे विजय अरोरा यांचेही २००७ मध्ये कॅन्सरने निधन झाले. बिभीषणाची भूमिका साकारणारे मुकेश रावल यांचे २०१६ मध्ये ट्रेन अपघातात निधन झाले. त्यांचे निधन होण्याआधीच त्यांच्या मुलाच्या मृत्यू झाल्याने ते खूप निराश झाले होते. राणी कैकेयीची दासी मंथराची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ कलाकार ललिता पवार यांनी साकारली होती. ललिता पवार यांचेही २४ फेब्रुवारी १९९८ मध्ये कॅन्सरने निधन झाले. हिंदी सिनेमांमध्ये ललिता पवार यांनी साकारलेल्या खलनायिका खूपच गाजल्या होत्या. मंथऱाच्या भूमिकेमुळे त्यांच्या अभिनयाला चार चाँद लागले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gvP1Ns