मुंबई- 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' मालिकेत नैतिकची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणारा अभिनेता सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. करणची पत्नी हिने करणवर घरगुती हिंसाचाराचे आणि मारहाणीचे आरोप केले आहेत. याप्रकरणी करणला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर करणची जामिनावर सुटका करण्यात आली. करण- निशाच्या या वादावर अनेक कलाकारांनी आपली मतं नोंदवली आहेत. आता छोट्या पडद्यावरील 'रामायण' या गाजलेल्या मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री यांनीही त्यांची बाजू मांडली. या संपूर्ण प्रकरणात दीपिका यांनी निशाची बाजू घेत तिच्या चेहऱ्यावरील खुणा तिला मारहाण झाल्याच्या घटनेचा पुरावा असल्याचं म्हटलं आहे. शिवाय निशाने यापूर्वीच पाउलं उचलत करणविरुद्ध तक्रार करायला हवी होती असं त्यांनी म्हटलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दीपिका यांनी म्हटलं, 'निशाच्या चेहऱ्यावरील व्रण पाहून हे स्पष्ट होतं की तिच्यासोबत काहीतरी वाईट घडलं आहे. पण मला वाटतं बातम्यांमध्ये जे काही दाखवलं जातंय त्यानुसार निशासाठी या घटना शारीरिक इजेपेक्षा मानसिकरित्या जास्त त्रासदायक ठरत आहेत.' निशाने यापूर्वी आवाज का उठवला नाही असं म्हणत दीपिका म्हणाल्या, 'मला वाटतं निशा हे सगळं मागील कित्येक वर्ष सहन करतेय, पण तिने असं करायला नको होतं. सुरुवातीलाच तिने स्वतःसाठी आवाज उठवायला हवा होता. त्यामुळे निशासोबत पुन्हा असं काही करण्याची त्याची हिम्मत झाली नसती. अशा वेळेस मुलींनी त्यांच्या मित्रपरिवारासोबत मिळून कठोर पाउल उचललं पाहिजे. ते खूप गरजेचं आहे. स्वतःसाठी उभं राहणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3prlG9B