Full Width(True/False)

'अचानक ते निघून गेले', वडिलांच्या आठवणीत सोनाली पाटील भावुक

मुंबई- 'बिग बॉस मराठी ३' ने पहिल्या दिवशीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या घरात जमलेले 15 सदस्य एकमेकांना समजून घेत घरात रुळण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींची एकमेकांसोबत चांगली गट्टी जमत आहे तर काहींचे इतरांसोबत वाद होत आहेत. घरातील सदस्य आता एकमेकांसोबत मोकळेपणाने बोलत आहेत. काही इतर कलाकारांसोबतचे त्यांचे किस्से सांगत आहेत तर काही आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगत मन मोकळं करत आहेत. अशात बिग बॉसच्या घरातील मात्र तिच्या वडिलांच्या आठवणीत भावुक झालेली पाहायला मिळाली. वाहिनीतर्फे दाखवण्यात आलेल्या प्रोमोनुसार सोनाली रूममध्ये तिच्या बेडवर बसून शिवलीला पाटील सोबत गप्पा मारत आहे. तेव्हा सोनाली शिवलीलाला तिच्या अभिनयातील प्रवासाबद्दल सांगते. परंतु, त्यासोबतच ती वडिलांच्या आठवणीने भावुक होते. 'वैजू नं. 1' ही सोनालीची पहिलीच मालिका होती. परंतु, छोट्या पडद्यावर आपल्या मुलीला पाहायला तिचे वडील या जगात नव्हते. सोनाली म्हणाली, 'माझ्या पहिल्या मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं. पण माझे वडील त्यांच्या मुलीचं काम पाहू शकले नाहीत. त्यांची एकादशी होती आणि द्वादशीला ते गेले. काहीच कारण नाही, कसलाच आजार नाही, अचानक ते आम्हाला सोडून गेले.' पुढे सोनाली म्हणाली, 'त्याच गोष्टीचं वाईट वाटतं की त्यांना माझं काम नाही बघता आलं.' त्यावर शिवलीला सोनालीला आधार देत म्हणते, 'ते आता जिथे कुठे असतील तिथून तुला पाहत असतील. त्यामुळे वाईट वाटून घेऊ नको.' सोनालीने 'वैजू नं. 1' मालिकेतून तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर सोनाली 'देवमाणूस' या गाजलेल्या मालिकेत वकिलाच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर सोनाली '' मध्ये सहभागी झाली.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kriMAV