मुंबई : अनेक दिवसांपासून दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध जोडी आणि हे परस्परांपासून विभक्त होत असल्याची सातत्याने चर्चा होत होती. त्यांच्या चाहत्यांना मात्र या दोघांचा घटस्फोट होऊ नये असेच वाटत होते. घटस्फोटाची बातमी अफवा ठरावी असे, ते प्रार्थनाही करत होते. याप्रकरणी सामंथा आणि नागा चैतन्य यांनी कोणताही खुलासा केला नव्हता. त्यामुळे त्यांच्यात आलबेल असेल अशी आशा त्यांच्या चाहत्यांना होती. परंतु आता या दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दोघेही घटस्फोट घेत असल्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली. या दोघांच्या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. काय लिहिले आहे पोस्टमध्ये सामंथा आणि नागा चैतन्य यांनी ते घटस्फोट घेत असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करून जाहीर केलं. नागा चैतन्य याने त्याच्या ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'खूप विचारविनिमय केल्यानंतर, सॅम आणि मी पती-पत्नी म्हणून वेगळे होत आहोत. आता आमच्या दोघांचे मार्ग वेगळे होत आहेत. आम्ही खूप भाग्यवान आहोत की, आमची मैत्री दहा वर्षांपेक्षा जास्त आहे जी आमच्या नात्याचा आधार होती. जी आमच्यामध्ये नेहमीच एक विशेष नाते ठेवेल. आम्ही आमच्या चाहत्यांना, माध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि पुढे जाण्यासाठी आमची प्रायव्हेट लाइफ तशीच राहू द्या. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार.' तशाच आशयाची पोस्ट सामंथाने देखील तिच्या इन्स्टाग्रामवरू शेअर केली आहे. सामंथा आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य यांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर २०१७ मध्ये लग्न केले. दोघे २०१० मध्ये ‘ये माया चेसावे’ चित्रपटात पहिल्यांदा भेटले होते. हे दोघेही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतलं सर्वात आयडल कपल मानलं जात होतं. परंतु, त्यांचे वैवाहिक आयुष्य चांगले जात नसल्याच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. असेही म्हटले जाते की, नागा चैतन्य बाळाचा विचार करत होता आणि त्यासाठी सामंथाने काही काळ चित्रपट करणे थांबवावे आणि कुटुंबाला पुढे न्यावे अशी त्याची इच्छा होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3AYQGTn