नवी दिल्ली : फेसबुकच्या मालकीच्या इंस्टंट व्हॉट्सअ‍ॅपने नवीन आयटी नियमांचे पालन सुरू केले आहे. याच आधारावर कंपनीने ऑगस्ट महिन्यात तब्बल २० लाख भारतीय यूजर्सचे अकाउंट बंद केल्याचे समोर आले आहे. कंपनीला ऑगस्टमध्ये ४२० तक्रारी आल्या होत्या. या आधारवर कंपनीने कारवाई केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आपला नवीन रिपोर्ट जारी केला आहे. याआधी कंपनीने भारतात १६ जून ते ३१ जुलै या ४६ दिवसांच्या कालावधी, ३,०३७,००० अकाउंट्स बंद केले होते. वाचाः २०,७०,००० भारतीय यूजर्सचे अकाउंट्स बॅन सोशल मीडिया कंपनी फेसबुकने ऑगस्ट महिन्यात नियमांचे उल्लंघन केल्यानंतर १० वेगवेगळ्या कॅटेगरीमधील ३.१७ कोटी कॉन्टेंटवर कारवाई केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या रिपोर्टनुसार, ऑगस्ट महिन्यात २०,७०,००० भारतीय अकाउंट्स बॅन केले. अकाउंट्स बॅन करण्याचे कारण WhatsApp ने याआधी म्हटले होते की, जे अकाउंट्स भॅन करण्यात आले आहेत त्यातील ९५ टक्क्यांपेक्षा अधिकवर Bulk Messages चा अयोग्य वापर केल्याने कारवाई करण्यात आली. जागतिक स्तरावर WhatsApp ने दरमहिन्याला ८० लाख अकाउंट्स बॅन केले आहेत. WhatsApp ने म्हटले की, भारतीय यूजर्सकडून दोन पद्धतीने तक्रारी आल्या. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार अधिकाऱ्याला ई-मेलच्या माध्यमातून आणि WhatsApp अकाउंटबाबत माहिती, पोस्टाच्या माध्यमातून तक्रारी मिळाल्या. फेसबुकने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ऑगस्ट २०२१ मध्ये ३.१७ कोटी कॉन्टेंटवर कारवाई करण्यात आली. इंस्टांग्रामने वेगवेगळ्या प्रकारातील २२ लाख कॉन्टेंटला हटवले आहे. फेसबुकनुसार, १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान, तक्रारीच्या माध्यमातून ९०४ यूजर्सचा रिपोर्ट मिळाला. यातील ७५४ प्रकरणं निकाली काढली गेली. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, तीन कोटींपेक्षा अधिक कॉन्टेंटमध्ये स्पॅम २.९ कोटी), हिंसक (२६ लाख), adult nudity and sexual activity (२० लाख), द्वेष पसरवणे (२,४२,०००) अशाप्रकारच्या कॉन्टेंटचा समावेश होता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39ZWUGM