मुंबई- 'विजयपथ', 'मकबूल', 'फितूर', 'अस्तित्व', 'चांदनी बार' आणि 'हैदर' यांसारख्या हिट चित्रपटात उत्कृष्ट अभिनय करत लोकप्रिय अभिनेत्री हिने प्रेक्षकांची मनं जिंकली. तब्बूने तिच्या चेहऱ्यावरील अप्रतिम हावभावाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आज ४ नोव्हेंबर रोजी तब्बूचा वाढदिवस आहे. अभिनय कारकिर्दीत तब्बूचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. मात्र तब्बूने अजूनही लग्न केलेलं नाही. तब्बूच्या अविवाहित राहण्यामागे एक महत्वाचं कारण आहे. या कारणाचा खुलासा अभिनेता याने एका मुलाखतीत केला होता. तब्बू आणि अजय एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. ते दोघे 'दे दे प्यार दे' या चित्रपटात एकत्र झळकले होते. चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान एका मुलाखतीत अजयने तब्बूच्या लग्न न करण्याचं कारण सांगितलं होतं. अजय म्हणाला होता, 'तब्बूला माझ्यासारखा मुलगा हवा होता. तिला माझ्यासारखा मुलगा आजपर्यंत मिळाला नाही त्यामुळे तिने लग्न केलं नाही. काजलला देखील हे माहीत आहे. तिला या गोष्टीची मुळीच अडचण नाहीये. ती म्हणते हे साधं आहे. मला वाईट नाही वाटत. एखाद्याला असं वाटू शकतं. काजलला तर आमचा 'दे दे प्यार दे' चा ट्रेलर देखील आवडला होता. ती बॉलिवूडमधली आहे. तिला माहितीये इथे काम कसं होतं.' एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, तब्बू आणि दाक्षिणात्य अभिनेता एकमेकांना डेट करत होते. त्यांचं नातं तब्बल १० वर्ष टिकलं. मात्र नागार्जुनने तब्बूसोबत लग्न करायला नकार दिला. नागार्जुनचं आधीच लग्न झालं होतं आणि तो त्याच्या पत्नीपासून वेगळं होण्यास तयार नव्हता. त्यानंतर तब्बूने नागार्जुनपासून दूर राहणं योग्य समजलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YfRiWF