Full Width(True/False)

दुःखद- माजी मिस केरल अंसी आणि रनरअप अंजनाचं निधन

नवी दिल्ली- आणि दक्षिण भारत २०२१ ची विजेती असलेली हिचा अपघाती मृत्यू झाला. अंसी कबीरसोबत मिस केरळ २०१९ ची उपविजेती अंजना शाजन हिचाही मृत्यू झाला. सोमवारी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दोघीही एकाच गाडीतून प्रवास करत होते. अंसी कबीर आणि यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही मॉडेल्सचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अंसी आणि अंजना एका प्रोजेक्ट संदर्भात त्यांचं मूळ गाव तिरुवनंतपुरमहून कोचीला एकाच गाडीने जात होते. यादरम्यान त्यांची कार व्यटिला-पलरिवट्टोम महामार्गावर असताना दुचाकीला धडकली. यादरम्यान कारचा तोल पूर्णपणे सुटल्याने कार थेट झाडावर आदळली. या घटनेत कारचा पूर्ण चक्काचूर झाला. गाडी ओळखणेही कठीण होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंसी आणि अंजना यांच्यासोबत कारमध्ये आणखी दोन पुरुषही होते. यादरम्यान या दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून, त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अंसी आणि अंजनाचे मृतदेह याच हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. अंसी कबीरच्या मृत्यूनंतर तिची शेवटची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती हिरवळीत फिरताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत अंसीने दिलेले कॅप्शन आता लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. अंसीने या व्हिडिओसोबत लिहिले की, 'आता जाण्याची वेळ आली आहे.' आता चाहते अंसीच्या या कॅप्शनवर कमेन्ट करून दुःख व्यक्त करत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3weJXDd