मुंबई : या मालिकेने छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेतील अरुंधती देशमुख, अनिरुद्ध देशमुख, संजना दीक्षित यांच्यासह मालिकेतील सर्वच पात्रं घराघरात पोहोचली असून ती लोकप्रिय झाली आहेत. संजना कायम अरुंधतीचे मनोधैर्य कसे कमी होईल, यासाठी कटकारस्थानं करत असते. ऑनस्क्रिन एकमेकींच्या विरोधात असलेल्या या दोघीजणी ऑफस्क्रिन मात्र खूप छान मैत्रिणी आहेत. इतकेच नाही तर खास अरुंधतीसाठी म्हणजे मधुराणीसाठी रुपालीच्या आईने चविष्ट बिर्यानी करून पाठवली होती. या दोघींनीही सेटवर छानपैकी बिर्यानी पार्टी केली. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेत अनिरुद्ध त्याची पहिली बायको अरुंधतीला घटस्फोट देऊन घरचांच्या इच्छेविरुद्ध संजनाशी लग्न करतो. त्यानंतर अरुंधती स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेते, यामध्ये तिला घरच्यांची साथ मिळते. मात्र हे करत असताना तिचं मनोधैर्य खच्चीकरणाचा प्रयत्न अनिरुद्ध आणि संजना सतत करत आले. अर्थात अरुंधती या सगळ्याला खंबीरपणे तोंड देत तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नकारात्मक भूमिका साकारणारी संजना आणि सर्वांसाठी आदर्श ठरणारी अरुंधती या दोघींचा स्वतःचा असा चाहता वर्ग आहे. ऑनस्क्रिनवर सतत अरुंधतीशी वाद घालणारी संजना ऑफस्क्रिनवर मात्र एकमेकींच्या खूप छान मैत्रिणी आहेत. त्यामुळेच संजनाने अर्थात ने अरुंधतीसाठी तिच्या आईच्या हातची खास बिर्याणी आणली होती. या दोघींनी मिळून सेटवरच या बिर्याणीवर ताव मारत पार्टी केली. विशेष म्हणजे दोघी एकाच ताटात जेवत आहेत. सध्या दोघींचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या दोघींना असं एकत्र जेवताना पाहून चाहत्यांनी फोटोवर भरभरून कमेन्ट केल्या आहेत. सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्धच्या मोठ्या मुलाचं अभिषेकचं अनघाशी लग्न होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशमुख कुटुंब त्याच लगबगीत आहेत. त्यातच अरुंधतीला तिच्या कॉलेजमधील मित्र आशुतोष केळकर भेटतो. त्याची स्वतःची म्युझिक कंपनी असून अरुंधतीला त्याने गाण्याच्या अल्बमची ऑफर दिली आहे. तसेच त्याच्या संगीत गुरुकुल विद्यालयात पार्टनरशिपही दिली आहे. आता अरुंधतीच्या आयुष्यात सुख येणार की त्याला पुन्हा कुणाची नजर लागणार हे मालिकेच्या आगामी भागांतून कळेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ssO3YA