मुंबई : अभिनेत्री आणि उद्या एकमेकांचे आयुष्यभराचे जोडीदार होणार आहेत. राजस्थानमधील चौथ का बरवाडा येथील ७०० वर्ष जुन्या सिक्स सेंस फोर्ट हॉटेलमध्ये विकी- कतरिनाचा शाहीविवाह सोहळा होणार आहे. या शाहीविवाह सोहळ्याआधी मेंदी, संगीत आदी कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. या दोघांच्या शाही विवाह सोहळ्याला कुटुंबातील नातेवाईक आणि जवळचे मोजके मित्रमंडळी सहभागी होणार आहेत. कतरिनाने जसे तिच्या एक्स रणबीर कपूरला लग्नाला बोलावलं नाही. तसेच विकीने देखील त्याच्या एक्स गर्लफ्रेंडलादेखील बोलावलं नाही. हरलीन सेठीची पोस्ट विकी कौशल आणि हे अनेक वर्षे रिलेशनमध्ये होते. परंतु कालांतराने त्यांच्यात दुरावा आला आणि ते वेगळे झाले. त्यानंतर दोघांनीही जाहीरपणे एकमेकांबद्दल बोलणं टाळलं. आता विकीच्या लग्नाला काहीच तास बाकी असताना हरलीनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आयुष्यावर भाष्य केलं आहे. हरलीनची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चिली जात आहे. हरलीनने काय लिहिलं हरलीन सेठीने तिच्या अधिकृत इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना हरलीनने लिहिलं की, 'प्रत्येकवेळी आयुष्याकडून अर्थ शोधणं योग्य असतं. परंतु असं करणं म्हणजे टोस्ट खाण्यामागचं कारण शोधण्यासारखं आहे. पण कधी कधी कोणत्याही कारणाशिवाय आपण टोस्ट खावा.' हरलीन आणि विकीचं नाते विकी कौशल आणि हरलीन शेट्टी हे अनेक वर्ष नात्यात होते. हे दोघेजण २०१८ मध्ये एकमेकांच्या जास्त जवळ आले. हरलीन- विकी कायम एकत्रच दिसायचे. मात्र हरलीनने विकीला इन्स्टावरून अनफॉलो केलं तेव्हा त्यांच्यात दुरावा आल्याचं समजलं. अर्थात हरलीनच्या इन्स्टाग्रामवर तिचे आणि विकीचे काही फोटो अजूनही आहेत. ब्रेकअपनंतर हरलीन म्हणाली... हरलीन आणि विकीने त्यांच्या नात्यावर कधीही जाहीरपणे भाष्य केलं नाही. जेव्हा एका मुलाखतीमध्ये हरलीनला विकीच्या आणि तिच्या नात्याबद्दल विचारण्यात आले होते, त्यावर हरलीन म्हणाली होती की, 'मला हा प्रश्न विचारून पुन्हा त्या काळात घेऊन जाऊ नका...' दरम्यान, हरलीन आता ब्रेकअपनंतर सावरली असून, पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आहे. अलिकडेच हरलीन 'ब्रोकन बट ब्युटिफूल' मध्ये दिसली होती. विकीच्या लग्नात कडक सुरक्षा व्यवस्था विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नामध्ये सहभागी होणाऱ्या वऱ्हाडी मंडळींवर काही बंधनं घालण्यात आली आहेत. त्यामध्ये त्यांना विवाह स्थळी मोबाईल वापरण्यावर मनाई केली आहे. तसेच विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यासही मनाई आहे. ही सगळी बंधनं पाळण्यासाठी विवाह सोहळ्याच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lMfQit