Full Width(True/False)

कतरिना- विकीने रद्द केले सारे प्लॅन, मुंबईला यायला निघालं जोडपं

माधोपूर- बॉलिवूड अभिनेत्री आणि विकी कौशल यांचा विवाह गुरुवारी ९ डिसेंबर रोजी राजस्थानमधील बरवाडा येथे झाला. असं म्हटलं जात होतं की लग्नानंतर कतरिना आणि विकी १२ डिसेंबरपर्यंत सिक्स सेन्स फोर्टमध्ये राहतील. मात्र त्यांनी पुढील दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आणि हे नवविवाहित जोडपं शुक्रवारी सकाळीच सवाई माधोपूरहून मुंबईला रवाना झाले. शेरपूर, सवाई माधोपूरमध्ये बनवलेल्या हेलिपॅडवर कतरिना आणि विकी हेलिकॉप्टरमध्ये चढताना दिसले. हे जोडपे हेलिकॉप्टरने जयपूरला पोहोचतील आणि तेथून चार्टर्ड फ्लाइटने मुंबईला रवाना होतील. कतरिना आणि विकी कौशलचे कुटुंबीय आणि बॉलिवूडमधील इतर पाहुणे आधीच कारमधून जयपूरला रवाना झाले. एक-दोन दिवसांत कतरिना आणि विकी मुंबईत रिसेप्शनची पार्टी देऊ शकतात, असं म्हटलं जात आहे. याआधी शुक्रवारी लग्नात आलेल्या पाहुण्यांसाठी जंगल सफारीचा कार्यक्रम ठेवण्यात येणार असल्याचे मानले जात होते. मात्र हे सर्व कार्यक्रम शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आले आहेत. कतरिना- विक्कीच्या लग्नात सहभागी झालेले काही पाहुणे अजूनही सिक्स सेन्स फोर्ट रिसॉर्टमध्ये थांबले आहेत आणि ते जंगल सफारी देखील करू शकतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lPT8py