Full Width(True/False)

गंगूबाईची स्क्रिप्ट ऐकताच ऑफिसमधून पळून गेली होती आलिया,भंसाळींनी सांगितला किस्सा

मुंबई- आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ती या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. तर चाहतेही आलियाच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी रिलीज झाली आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भंसाळी यांनी केलं आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकल्यावर आलियाची पहिली प्रतिक्रीया काय होती याबाबत सांगितलं आहे. आलियाच्या या प्रतिक्रियेनंतर संजय लीला भंसाळी यांना चित्रपटासाठी दुसरी अभिनेत्री शोधावी लागेल असे वाटलं होतं. 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत संजय लीला भंसाळी यांनी सांगितलं की,आलियाला चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर ऑफिसमधून पळून गेली होती. आलियाची अशी प्रतिक्रीया पाहिल्यानंतर त्यांना असं वाटल की आता तिला दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरू करायला हवा. नवीन अभिनेत्री शोधण्यास सांगितलं होतंसंजय लीला भंसाळी यांनी सांगितलं की, 'मी माझ्या कंपनीच्या सीईओ प्रेरणा यांना सांगितलं होतं की या चित्रपटासाठी दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरू करुयात.' पण दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांना या चित्रपटात गंगूबाईच्या भूमिकेसाठी आलियाच हवी होती आणि तसंच झालं. दिग्दर्शक म्हणले, 'मला दुसऱ्या दिवशी सकाळी आलियाचा फोन आला आणि सांगितलं की मला तुम्हाला भेटायच आहे. मी तिला सांगितलं की तुला या चित्रपटासाठी नकार द्यायचा असेल तर मला भेटण्याची गरज नाही.' संजय लीला भंसाळी यांनी पुढे सांगितलं की, 'माझं असं उत्तर ऐकताच आलियाला राग आला आणि ती म्हणाली की ती मी जे करायला सांगेन ते ती करेल. आलियाच हे उत्तर ऐकताच संजय लीला भंसाळी यांना आनंद झाला आणि काय करू आणि काय नाको कळत नव्हते. आलियाचा होकार ऐकून ते खूष झाले. 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाचा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवमध्ये प्रीमियर होणार झाला. ज्यासाठी आलिया आणि संजय लीला भंसाली बर्लिनला गेले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/b7OCwBr